शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

गटशेतीतून कृषी विकासाचा प्रयोग यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 10:41 PM

गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आनंदवन येथे गटशेती समूहांचे प्रशिक्षण, अनेकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.यावेळी डॉ. विकास आमटे, माजी आमदार संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, वरोरा प.स. सभापती रोहिणी देवतळे, राहुल सराफ, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, नरेंद्र जीवतोडे, उपविभागीय अधिकारी (कृषि) राजवाडे, पाटील, गौतम करार, पोतदार, महारोगी सेवा समिती संचालक कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.ना. अहीर पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. तर गटशेतीच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद म्हणून समूह शेती, समूह विकास हा आहे. आपला देश कृषि प्रधान आहे, असे आपण म्हणत असलो तरी मागील सरकारच्या काळात अन्नधान्य आयात करावे लागत होते तर या सरकारच्या काळात अन्नधान्य निर्यात करू लागलो हे मोठे यश आहे. रस्ते विकासाकरिता सीआरएफ फंडप्रमाणे कृषि सिंचनाकरिता निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी आपण मागील सरकारकडे केली होती. परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्यांदा देशात प्रधानमंत्री कृषि सिंचनावर तरतू करण्यात आली आहे. याचा अर्थ हे सरकार कृषि पोषक सरकार आहे, हेच सिध्द होते. गटशेतीच्या माध्यमातून अन्नधान्य, प्रोसेसिंग व मार्केटींग हे सर्व उपक्रम राबविण्याची तरतूद असून शेतकरी गट शेती व्यापारात समोर आल्यास हे एक पुरोगामी पाऊल ठरेल. रसायनमुक्त अन्नधान्याची गरज जगात असून त्याकरिता जादा किंमत जग मोजण्यास तयार आहे व निर्यातीस मोठा वाव आहे. या संधीचा उपयोग शेतकऱ्यांनी करण्यासाठी गट शेती करणाऱ्या समुहानी समोर येण्याचे आवाहन ना. अहीर यांनी केले.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, सहनशील आहे म्हणूनच सरकारे टिकून आहेत, असे मत नोंदवून ना. अहीर म्हणाले की, यापुढे देशात पुल वजा बंधारे बांधण्याचे धोरण ना. नितीन गडकरी यांनी निश्चित केल्याने देशाची सिंचन क्षमता वाढणार आहे.आनंदवन हे यापुढे शेती प्रयोगाची पंढरी होणार असून गट शेतीच्या शेतकरी समूहासाठी ते प्रेरणास्थान राहणार आहे. आनंदवन समूह गटशेती शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे समाधान असल्याचे मत ना. अहीर यांनी नोंदविले. या प्रशिक्षणात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व अमरावती येथून एकूण १३ गट उपस्थित होते. तर त्यांच्या माध्यमातून जवळपास तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.