शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांसाठी यंत्रणेने पुढे यावे

By admin | Published: May 07, 2017 12:28 AM

शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येते.

अधिकाऱ्यांना दिले निर्देश : पालकमंत्र्यांकडून खरीप नियोजनाचा आढावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्यांकडे असणाऱ्या कर्जाजी रक्कम म्हणून परस्पर कपात करण्यात येवू नये, कपात केली असल्यास तातडीने त्याच्या खात्यात पुन्हा जमा करावी. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक वेळी मदतीसाठी सर्व यंत्रणेने तयार रहावे, या मोसमात शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. २०१७-१८ खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा त्यांनी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात घेतला. या बैठकीत शेतकऱ्यांचे बचत खात्याशी कर्ज खाते जोडले असल्यामुळे विविध योजनांसाठी लाभार्थी म्हणून मिळालेली रक्कम परस्पर कपात केली जात असल्याच्या तक्रारी अनेक अधिकाऱ्यांनी नमूद केल्या. त्यामुळे यापुढे बँकेने शेतकऱ्यांना मनस्ताप होईल, अशा पध्दतीची कपात करु नये. तसेच विविध योजनांच्या संदर्भात पत पुरवठा करताना, कर्जाचे पुनर्गठण करताना बँकेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील, असा सूचक संदेश त्यांनी बँकांना दिला. शासनाच्या उन्नत शेती, समृध्द शेतकरी या धोरणाचा पुरस्कार करत आगामी खरीपाचे नियोजन करण्यात यावे, शासनाच्या सर्व यंत्रणांनी परस्पराशी समन्वय ठेवत शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाणी, विजेची व वीज पंपांची उपलब्धता, मागेल त्याला विहीर, आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय जिल्हयातील खरीप हंगामासाठी बियाणाची उपलब्धता, खते, हवामानाचा अंदाज, जिल्हयातील कृषी केंद्राची तपासणी, गुणनियंत्रण, भरारी पथकांचे गठन, गोदामांची उपलब्धता, विज पंपाची सद्यस्थिती, सिंचन आदी बाबींचा घटकवार आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रलंबित विद्युत मीटर, खते व बियाण्यांची उपलब्धता व बँकेचे कर्ज आदी विषयावर उपस्थित सदस्यांनी चर्चा केली. आरोग्य तपासणी मोहिमेचाही घेतला आढावा१ मेपासून सुरु झालेल्या मोफत आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचा आढावाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यावेळी चंद्रपूर जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला नागपूर अन्य जिल्हयातून डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर व अन्य यंत्रणेची किती प्रमाणात मदत होईल या संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला नागपूर विभागातील विविध आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना मोफत आरोग्य पुरविण्याची संधी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानातून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या वेगवेगळया घटकांनी परस्पराशी समन्वय ठेवून उपक्रम यशस्वी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. या अभियानात गेल्या तीन दिवसात चार हजार ५७२ नागरिकांचा आरोग्य डाटा निर्माण केल्याबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. चार लाख ७६ हजारांवर खरिपाचा पेरासन २०१७-१८ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ७६ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात एक लाख ८० हजार ३६८, सोयाबिन ८० हजार ७९३, कापूस एक लाख ६९ हजार ३४९, तुर ४९ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हयाला विविध पिकांकरिता एकूण ७५ हजार ९९९ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. जिल्हयास खरीप हंगामाकरिता एक लाख २२ हजार ६००मे.टन रासायानिक खतांचे आवंटन आहे.