शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

अपघात प्रवण क्षेत्रात उपायोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:42 PM

जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : पोलीस मुख्यालयात रस्त्यांचा आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी खेमणार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्या साखरवडे, कार्यकारी अभियंता जयस्वाल, जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, २०१५ ते २०१७ या वर्षात जिल्ह्यात अपघात व मृत्यंूचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील २८ ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र म्हणून परिवहन विभागाने निवड केली. शिवाय उपाययोजनाही सुचविल्या आहेत. काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामूल्य मदत घेण्याचा प्रस्ताव या बैठकीत ठेवला. ना. अहीर यांनी या प्रस्तावा दुजोरा दिला. जिल्ह्यात अवैध बस वाहतूक, जड वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत आहे. अशा वाहणांवर कडक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५ लाख ७४ हजार वाहने असून त्यामध्ये ४ लाख ७० हजार दुचाकी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होते. जिल्ह्यातून १०७ कोटींचा महसूल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला मिळतो. त्यामुळे विभागाचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येईल, असेही ना. अहीर यांनी सांगितले. अशा प्रकारची बैठक तीन महिन्यांतून एकदा घ्यायची असली तरी दोन महिन्यांच्या आत बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार व पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली.