शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तेलीयाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2017 12:37 AM

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली.

वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात : वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरजदुर्गापूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली. बुधवारी अकस्मात लागलेल्या या आगीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. कोर झोनमध्ये आग लागल्याने वाघासह अन्य सरपटणाऱ्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ६२५ चौ.किमीच्या संरक्षित क्षेत्रात कोर झोनचा दर्जा आहे. याच्या मध्यभागी तेलीयाचे जलाशय आहे. उन्हाळ्यात ताडोबातील बहुतेक नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. ताडोबा जलाशयाव्यतिरिक्त केवळ तेलीया जलाशयात मुबलक पाण्याचा साठा असतो. मुबलक पाणी व हिरव्यागार असलेल्या या जलाशयाच्या आसपास वाघासह सारेच वन्यजीव आश्रयास असतात. अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्वाच्या ठिकाणी गुरुवारी (२७) अकस्मात भिषण आग लागली. तीव्र गतीने जोरदार वाऱ्याच्या दिशेने या आगीचा सर्वत्र भडका उडत होता. बॉम्बचा स्फोट होऊन भडका उडतो, त्याप्रमाणे या आगीचे रौद्ररुप होते. काही वेळातच या आगीने तेलीया जलाशयासभोवतालचे ४.५ किमीचे क्षेत्र कवेत घेतले. जैवविविधतेने संपन्न अशा वन्यजीवांच्या आश्रयस्थानाची काही वेळातच राखरांगोळी झाली. सध्या सूर्य आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात वन्यप्राणी तेलीया जलाशयाच्या आश्रयात राहतात. मात्र या परिसरालाच आग लागल्याने वाघासह अन्य वन्यजीव प्रभावित झाले आहे. तृणभक्षी वन्यजीवांचा चारा, पक्ष्यांची पिल्ले, अंडी, घरटे, सरपटणारे प्राणी किटक फूलपाखरे तसेच विविध वनस्पती बियाणे भस्मसात झाले. तेलीया जलाशयाच्या या ४.५ किमीच्या राऊंडमध्ये एरवी पर्यटकांना वाघासह सरपटणाऱ्या वन्यजीवांचे हमखास दर्शन होत होते. मात्र आता तेथे केवळ जळालेली वृक्ष व राखेचे दर्शन होत आहे. यामुळे पर्यटकांचाही भ्रमनिराश होत आहेत.मानवनिर्मित या आगीमुळे वनाचे वैभव असलेल्या वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. व्याघ्र संरक्षण व संवर्धन करण्याकरिता वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला ठिकठिकाणी आगी लागतच आहेत. यातच ताडोबाच्या कोर झोनमध्ये आग लागणे, हे वन्यजीवांच्या अस्तित्वाकरिता एक धोक्याची घंटा आहे. याकरिता वनविभागाला ठोस पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)