शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

प्रतिभावंतांनी वर्तमानातील ज्वलंत वास्तव मांडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:27 AM

चंद्रपूर : कविता, कथा, कादंबरी, नाटक व लेखनाचे विविध अनुबंध समाज जागृतीची प्रभावी माध्यमे आहेत. प्रतिभावंतांनी आपले जीवनानुभव अधिकाधिक ...

चंद्रपूर : कविता, कथा, कादंबरी, नाटक व लेखनाचे विविध अनुबंध समाज जागृतीची प्रभावी माध्यमे आहेत. प्रतिभावंतांनी आपले जीवनानुभव अधिकाधिक समृद्ध करून वर्तमानातील वास्तव मांडावे. कवी प्रब्रह्मानंद मडावी हे ‘बफरझोन’ काव्यसंग्रहातून ज्वलंत वास्तव मांडण्यास यशस्वी ठरले, असे प्रतिपादन मूलच्या नगराध्यक्ष व लेखिका प्राचार्य रत्नमाला भोयर यांनी केले. मूल येथील कन्नमवार सभागृहात शुक्रवारी ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक दशरथ मडावी तर प्रमुख पाहुणे तहसीलदार रवींद्र होळी, कार्यकारी अभियंता ईश्वर आत्राम, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, वरिष्ठ सहायक वैज्ञानिक देवानंद उईके, डॉ. वामन शेळमाके, प्रा. संदीप गायकवाड, सिनेट सदस्य सुनील शेरकी, समता परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, प्रा. विठ्ठल आत्राम व अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा कोषागार अधिकारी पेंदाम यांनी काव्यसंग्रहाच्या सामर्थ्यस्थळांवर भाष्य केले. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांना उजागर करून कवीने समाज परिवर्तनाचा संदेश दिल्याचे सांगितले. डॉ. शेळमाके, प्रा. लोनबेले, शेरकी यांनीही आदिवासी साहित्यात प्रब्रह्मानंद मडावी यांचा दुसरा काव्यसंग्रह दखलपात्र असल्याचे सांगितले. प्रा. गायकवाड यांनी ‘बफरझोन’ शोषणाचे प्रतीक असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष मडावी यांनी ‘बफरझोन’ काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये अधोरेखित करून एकूणच आदिवासी समाजाची स्थिती व गती, परिवर्तनाची अपरिहार्यता आदी पैलुंवर प्रकाश टाकला. कवी मडावी यांनी लेखनामागील भूमिका विशद केली. कोविड काळात नि:शुल्क रूग्णसेवा करणारे डॉ. प्रवीण येरमे व डॉ. शारदा येरमे तसेच प्रसिद्ध चित्रकार भारत सलाम यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. स्वागतगीत राजेश संगेल, चिदानंद सिडाम, अरविंद मसराम यांनी सादर केले. संचालन प्रा. महेश गेडाम तर प्रास्ताविक प्रा. विठ्ठल आत्राम यांनी केले. अरविंद मेश्राम यांनी आभार मानले. आयोजनासाठी राजू बन्सोड, लक्ष्मण सोयाम, यश मडावी, दिनेश करकाडे, भय्याजी उईके व उलगुलान साहित्य मंचाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.