शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

ठाण्यातील दूरध्वनी बनले शोभेची वस्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:29 AM

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर ...

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर फोन करून माहिती दिली जाते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ पैकी अनेक पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंद अवस्थेत असल्याने, नागरिकांना ठाण्यापर्यंत माहिती पोहोचविणे कठीण जात आहे. हे टेलिफोन नेमके कशामुळे बंद झाले की, बंद केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात चंद्रपूर येथे रामनगर व शहर ठाणे स्वतंत्र आहेत. त्याचबरोबर, पडोली, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, ढाबा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर, मूल, सावली, सिंदेवाही, पाथरी, ब्रह्मपुरी, नागभीड, भद्रावती, वरोरा, मांजरी, शेगाव, चिमूर व भिसी व उपपोलीस ठाणे मिळून जिल्ह्यात एकूण ३५ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पूर्वीपासूनच जिल्ह्यातील ३५ ठाण्यात भारतीय दूर संचार निगमचे टेलिफोनचा वापर केल्या जातो. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनास मिळावी, यासाठी टेलिफोन महत्त्वपूर्ण मानल्या जातो. येथील बहुतांश पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंदच असल्याने, ग्रामीण भागात कार्यरत असलेले पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्षासह नागरिकांना माहिती देणे कठीण झाले आहे. सध्या दूरध्वनीचा वापर वाढला असला, तरी टेलिफोनचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. अनेक वेळा दूरध्वनीला तांत्रिक अडचण, नेटवर्कचा अडसर येतो. त्यामुळे ठाण्यात टेलिफोन कार्यान्वित असणे अत्यावश्यक आहे, परंतु पोलीस विभागाने या यंत्रणेकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे दिसून येते.

बॉक्स

कोरोनात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पोलिस यंत्रणा समर्थपणे पेलत आहे. ग्रामीण भागातून ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा पाऊल उचलते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व ३५ पोलीस ठाण्यापैकी बरेच बंद असलेल्या ठाण्याचे टेलिफोन सुरू होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.