शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

शिवभोजन थाळी पुन्हा शिजणार; केंद्र चालकांवरचे टळले संकट

By राजेश मडावी | Updated: May 4, 2024 15:42 IST

अखेर २ कोटी ७१ लाखांचे अनुदान : गोरगरिबांना जुलैपर्यंतच आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोरगरिबांना १० रुपयांत जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेला विद्यमान सरकार वेळेवर अनुदान देत नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली होती. काही संचालकांनी तर घरचे दागिने गहाण ठेवून शिवभोजन केंद्रांचा खर्च चालवत असल्याच्या घटनाही पुढे आल्या होत्या. राज्य सरकारने गुरुवारी (दि. २) एप्रिल ते जुलै २०२४ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्रांना २ कोटी ७१ लाख ४४ हजारांचे अनुदान अखेर मंजूर केले.

शिवभोजन थाळी योजनेत दहा रुपयांत थाळी मिळत होती. सुरुवातीपासून या थाळीला लोकांचा प्रतिसाद मिळाला. गरिबांसह सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच या थाळीचा आधार वाटत आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस पवारांचे सरकार सत्तेत आले. त्यांनी अगदी सुरुवातीला महाविकास आघाडीने राबविलेल्या योजनांना स्थगिती दिली. त्यानंतर त्यापुढे काही योजना चालू ठेवल्या; मात्र शिवभोजन केंद्रांना अनुदान देण्यात हात आखडता घेतला. त्यामुळे केंद्र चालकांची अर्थकोंडी झाली.

कोरोना काळात शिवभोजन थाळीने नागरिकांना मोठा आधार दिला होता. सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बरी झाली तर थाळीची मागणी कमी होईल, असा अंदाज होता; मात्र सध्याचे चित्र फार निराशाजनक आहे. अजूनही हजारो नागरिक शिवभोजन थाळीवर निर्भर आहेत. एकीकडे लोकांची मागणी तर दुसरीकडे अनुदान देण्यात सरकारकडून विलंब अशा संकटात अडकलेला केंद्रचालक हैराण असतानाच सरकारने २ कोटी ७१ लाख ४४ हजारांचे अनुदान मंजूर केले आहे.

ही योजना चालते कशी ?प्रतिथाळीमागे ग्राहकाकडून १० रुपये घेतले जातात. शासनाकडून शहरी व ग्रामीणसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते. शहरासाठी प्रत्येक थाळीमागे ४०, तर ग्रामीणसाठी २५ रुपये अनुदान दिले जाते. शिवभोजन केंद्रावर १० रुपयांत लाभार्थीना ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १० ग्रॅम वाटीभर वरण आणि १५० ग्रॅम भात दिला जात आहे. लाभार्थी दुपारचे एकवेळचे जेवण करू शकतो. दुपारी १२ ते ३ या पाच तासांत शिवभोजनाचा लाभ मिळतो.

दोन आठवड्यांत रक्कम जमाराज्य शासनाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक (शिधा- वाटप) या कार्यालयाला अनुदान वितरण करण्यात येणार आहे. शासनाने यापूर्वी निर्देशित केलेल्या शिवभोजन अॅप माहितीच्या अनुषंगाने परिगणना करून ऑनलाईन पद्धतीने १५ दिवसांनी ही रक्कम शिवभोजन केंद्र संस्थांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याच्या सूचना धडकल्या आहेत.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयGovernmentसरकारfoodअन्न