शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सावली विधानसभेच्या तत्कालीन आमदाराने भूषविले मुख्यमंत्री पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 14:58 IST

Chandrapur : मा. सा कन्नमवार यांनी केले महाराष्ट्राचे नेतृत्व

उदय गडकरी लोकमत न्यूज नेटवर्क सावली : परिसीमन आयोगाने गोठवलेल्या १५६ सावली विधानसभा क्षेत्रातून निवडून गेलेले स्व. मा. सा. कन्नमवार यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यानंतर स्व. वामनराव गड्डमवार, शोभाताई फडणवीस यांच्या गळ्यातसुद्धा मंत्रिपदाची माळ घालण्यात आली. शोभाताईंनी तर सलग चार पंचवार्षिक निवडणुका (९०, ९५, ९९, २००४) सावली विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. परंतु, या दोघांनाही मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारता आलेली नाही.

सन २००९मध्ये परिसीमन आयोगाने सावली विधानसभा क्षेत्र गोठवून सावली तालुक्याला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात अंतर्भूत केले. सावली विधानसभा क्षेत्राचे अस्तित्वच मिटवून टाकले. १९५२मध्ये भारतात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासूनच मध्य प्रांतात सावली विधानसभा क्षेत्राचे अस्तित्व होते. मात्र, एकमेव स्व. मा. सा. कन्नमवार यांचे मुख्यमंत्रिपद सोडले तर कुणीही नेता त्या पदापर्यंत पोहोचू शकला नाही. 

६२ वर्ष पूर्ण १९६२ मध्ये निवडून आलेल्या स्व. कन्नमवार यांच्या निवडणुकीलाही ६२ वर्षांचा कालावधी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची पुनरावृत्ती या क्षेत्रातून झाल्यास जुन्या १५६ सावली विधानसभा क्षेत्राचा योगायोगच समजावा लागेल. महाराष्ट्रत पहिली निवडणूक १९६२ स्व. दादासाहेब कन्नमवार यांनी जिंकून ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९६७ स्व. वामनराव गड्डमवार, १९७२ स्व. यशोधरा बजाज, १९७८ देवराव भांडेकर, १९८०मध्ये स्व. महादेवराव ताजने, १९८५ स्व. वामनराव गड्डमवार, १९९० ते २००४ शोभाताई फडणवीस यांनी सावली विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरPoliticsराजकारणMLAआमदारChief Ministerमुख्यमंत्री