शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२९.९७ लाखांच्या बंधाऱ्याचं काम फक्त दहा दिवसांतच झाले पूर्ण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:53 IST

Chandrapur : तक्रारींनंतर अधिकाऱ्यांची झोप उडाली; मंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे २९.९७ लाख रुपये खर्चुन दहा दिवसांत बंधारा बांधण्यात आला. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेशही देऊन टाकला. या बंधाऱ्याच्या गैरव्यवहाराबाबत अधिवेशनादरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील नाही तर विभागीय अधिकाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे.

या विभागाचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी लेखी उत्तरात २९.९७ लाखांचा दहा दिवसांत बंधारा बांधल्याचे खरे असल्याचे लेखी उत्तरात मान्य केले आहे. या बंधाऱ्याची तांत्रिक तपासणी प्रक्रिया सुरू असून अंतिम अहवाल प्रलंबित असल्याचेही सांगितले. त्यामुळे या बंधाऱ्यात अडकलेल्या अनेकांचे सध्या धाबे दणाणले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग चंद्रपूर यांनी पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे नाला बंधारा बांधकामासाठी निविदा काढली. ही निविदा माँ जयदुर्गा मजूर सहकारी संस्था मर्यादित राजुरा, या संस्थेला २९.९७ लाख रुपयांमध्ये मंजूर करून २१ मार्च २०२३ ला कार्यारंभ आदेश काढण्यात आला. बंधारा बांधकाम करण्याचा कालावधी तीन महिन्यांचा असतानाही अवघ्या १० दिवसांत काम पूर्ण करण्यात आले.

चंद्रपूर समितीमध्ये तीन अधिकारीनागपूर येथील समितीने चौकशी करण्यापूर्वी चंद्रपूर येथील समितीने तपासणी केली. या समितीमध्ये जिल्हा परिषद मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि तीन सदस्य होते. त्यांनी प्राथमिक अहवाल तयार करून टेक्निकल अहवालासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीला पाचारण केले. मात्र अभियांत्रिकीच्या समितीने अद्यापही अहवाल सादर केला नसल्याची माहिती मिळाली आहे.

'लोकमत'ने वेधले होते लक्षया बंधाऱ्याबाबत ५ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमतने 'अहो आश्चर्य... २९.९७ लाखांच्या बंधाऱ्याचे काम अवघ्या दहा दिवसात' या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात अहवाल मागितला होता. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली.

चौकशीचे केवळ सोपस्कार, नागरिकांचा आरोप■ या बंधाऱ्याच्या तपासणीसाठी नागपूर येथील एका समितीने २२ जून २०२४ रोजी तपासणी केली. मात्र ही तपासणी थातूरमातूर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी समितीचा प्रयत्न असल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.■ बांधकामाची तपासणी जलसंधारणच्या निक- षानुसार करणे अपेक्षित असतानाही नागपूर येथील समितीने बांधकामाच्या दर्जाची तपासणी अत्याधुनिक यंत्राद्वारे केली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

उमरी पोतदार येथील बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. कामामध्येही अनियमितता आहे. यासंदर्भात अधिवेशनादरम्यान, प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नाही. याबाबत पुढील अधिवेशनामध्येही प्रश्न उपस्थित केला जाईल. दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवू.- सुधाकर अडबाले, आमदार 

टॅग्स :Governmentसरकारchandrapur-acचंद्रपूर