शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

...तर जिल्ह्यातील सुरू होऊ शकतात शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:18 AM

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गावांमधील शाळा सुरु करता ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या गावांमधील शाळा सुरु करता येतील का, यासंबंधीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तिसऱ्या लाटेचाही धोका कायम आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत ८४ हजार ६६४ जणांना कोरोना बाधा झाली आहे. यातील ८२ हजार ९०८जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत २२९

कोरोना बाधित उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. जर येत्या काही दिवसामध्ये कोरोनामुक्त जिल्हा झाल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये १८३६ गावे आहेत. दरम्यान, दुसऱ्या लाटेमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातही कोरोरा रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अजूनही धास्तावलेले आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने लसीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहे. मध्यंतरी कोरोना शिथिल झाला असताना नववी, दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. तर २७ जानेवारीपासून पाचव्या वर्गापासून शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच वर्गोन्नत करण्यात आले. आता २८ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. मात्र कोरोना संकटामुळे शाळेत केवळ शिक्षक जात आहेत. त्यातच डेल्टाचा धोका असल्यामुळे राज्य शासनाने पुन्हा निर्बंध घातले आहे. अशावेळी शाळा सुरु होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त गावांचा आढावा घेण्याबाबतच्या सूचना केल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरु होतील, अशा आशा व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील जि.प.शाळा -१५५७

अनुदानित शाळा- ३७५

विना अनुदानित शाळा-३९१

महापालिका शाळा -५९

समाजकल्याण शाळा-५६

बाॅक्स

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पाचवी-३२८४५

सहावी-३२२५७

सातवी-३३१६१

आठवी-३३४४१

बाॅ्क्स

जिल्ह्यातील एकूण गावे-१८३६

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे-

कोट

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावात शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. मात्र तिसरी लाट तसेच डेल्टाचा धोका असल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच शाळा सुरू कराव्यात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे सध्यातरी गरजेचे आहे.

-पारस पिंपळकर

सरपंच संघटना,