शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 12:40 IST

ना मंत्रिमंडळाचा विस्तार ना पालकमंत्री नियुक्त, विकासकामे रखडली

चंद्रपूर : राज्यात तीन महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन झाले असले तरी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यासारखे आहे. ना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ना पालकमंत्र्यांची नियुक्ती. प्रशासन ठप्प आहे. शासनाने विकासकामे सुरू करण्याऐवजी अंदाजपत्रकात मंजूर केलेली कामे व सुरू झालेली विकासकामे रखडली आहेत. राज्यात विकास ठप्प झाला आहे. सरकारला राज्यातील जनतेची पर्वा नाही, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला.

खनिज विकास निधीचेही काम रखडले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. डीपीडीसीचा निधी दोन वर्षांत खर्च झाला नाही तर तो परत जातो. असे सुमारे २६८ कोटी रुपये खर्च झाले नाहीत. परत जाण्याचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपला विकासविरोधी ठरवून ते म्हणाले की, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा विकास निधीचे काम बंद पाडले आहे. रुग्णालय, पंचायत समिती अगदी रस्त्याचे कामही ठप्प झाले आहे. अंदाजपत्रकात मंजूर झालेले काम रखडले आहे. हे काम थांबवण्यासाठी या सरकारचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवावे. लम्पीचा रोगाचा गुरांना धोका निर्माण झाला आहे; मात्र सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहेे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ३०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप त्याचे वितरण सुरू केलेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे. राज्यात २४ तासांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत; मात्र हे सरकार उत्सव साजरे करण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे हे सरकार नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, संचालक शेखर धोटे, चंद्रपूर शहर यु.सी.चे अध्यक्ष राजेश अडूर, माजी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस