शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

दररोज 10 ते 15 जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे.  त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते.

ठळक मुद्देतीन हजार ७०० जण घेतात लाभ : २६ केंद्रावरुन सेवा सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कुणीही उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरुन दररोज १५ ते २० जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे.  त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या तसेच वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.

रोज तीन हजार ७०० जणांचे पोट भरते, बाकीच्याचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: तीन हजार ७०० जण घेत असतात. परंतु, अनेकजणांना थाळी भेटत नसल्याने गेल्यापावली परत यावे लागते. एका केंद्रावरुन किमान १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्राची संख्या तसेच थाळी संख्या वाढवावी, त्यासोबतच जेवन वितरीत करण्याची वेळ वाढविण्याची गरज आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेकजण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे येथील केंद्रावरील थाळी लवकरच संपत असते. या केंद्रावर साधारणत: १५ ते २० जण परत जात असतात. 

बसस्थानक केंद्र शहरात कामानिमित्त अनेकजण येत असतात. बसस्थानकाशेजारी केंद्र असल्याने अनेकजण या केंद्रावर जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच रांग दिसून येते. परिणामी येथील थाळी लवकरच संपत असते. त्यामुळे साधारणत: दहा ते बाराजण परत गेले.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय