शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

१२ दिवसांपासून त्यांची पायी मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM

मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मजुरांनाही त्याचा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बारा दिवस झालेय. त्यांची पायपीट सुरू आहे. त्यांना त्यांच्या गावी पोचायला आणखी चार ते पाच दिवस लागतील. तेव्हाच त्यांची ही पायपीट थांबणार आहे आणि त्यांचा जीव भांड्यात पडणार आहे.मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मजुरांनाही त्याचा फटका बसला. कंत्राटदाराने काम बंद करुन मजुरीही देणे बंद केले. या मजुरांजवळ जे काही शिल्लक होते त्यावर काही दिवस भागले. त्यानंतर उपासमार होऊ लागल्याने त्यांनी गावाचा रस्ता धरला. तीन महिला, त्यांची दोन छोटी मुले व आठ पुरूषांचा हा जत्था शुक्रवारी नागभीडवरून पायदळ जात असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपली आपबिती कथन केली. यातील शिवकुमार डोंगरे व अशोक वैद्य यांनी सांगितले की, १२ दिवसांपूर्वी हैद्राबाद सोडले. दिवसभर प्रवास करायचा आणि रात्री एखादे गाव बघून मुक्काम करायचा. अशाप्रकारे आतापर्यंत साडेसहाशे ते सातशे किमीचे अंतर कापून झाले आहे. सोबत महिला व लहान मुले असल्यामुळे त्यांना प्रवास हळू करावा लागत आहे. या प्रवासातील आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की, वाटेत आम्हाला कधीही उपासी राहावे लागले नाही. प्रत्येक ठिकाणी सहकार्य मिळाले. गावी पोचायला आणखी चार दिवस तरी लागतील असे सांगून समोर निघून गेले.

टॅग्स :Labourकामगार