शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

हजारो शेतकऱ्यांचे चुकारे पणन महासंघाकडे थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 3:49 PM

दोन महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विकलेल्या कापसाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे.

ठळक मुद्देऐन हंगामात शेतकरी आर्थिक कोंडीतकापूस विकून दोन महिने लोटले

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांचा कापूस हमी भावाने कापूस पणन महासंघाने ३० जूनपर्यंत खरेदी केला. त्यानंतर शेतीचा हंगाम सुरु होवून पिके फुलावर आले असताना दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विकलेल्या कापसाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहे.

मागील हंगामात पणन महासंघाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर, भिसी व गोंडपिपरी येथे हमी भावाने कापूस खरेदी केंद्र सुरु केले. हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली, त्याच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. हमीभाव कापूस खरेदी केंद्राकरिता जिनिंग सापडत नव्हत्या. पणन महासंघाकडे अपुरा कर्मचारी वर्ग, अशा स्थितीमध्ये हमीभावाने कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर कापूस व गाठी ठेवण्याकरिता जागा नसणे, अकाली पावसाने हजारो क्विंटल कापूस भिजणे, अशा कारणामुळे मागील हंगामात अनेक दिवस कापूस खरेदीमध्ये अनियमिता आली. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता कापूस खरेदी कित्येक दिवस बंद राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस शिल्लक असल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते.

काही कालवधीनंतर कापूस खरेदी सुरु करीत ८ जून ते ३० जूनपर्यंत कापूस खरेदी करण्यात आला. त्यात वरोरा ८७९, चिमूर, भिसी ४०० तर गोंडपिपरी केंद्रावर २५० अशा एकूण १५२० शेतकऱ्यांनी कापसाची हमीभावाने विक्री केली. आज जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस विक्रीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने दिवसागणिक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यांना आर्थिक संकटातून सोडविण्याकरिता पणन महासंघाने विकलेल्या कापसाची रक्कम त्वरित बँक खात्यात जमा करावी.- राजेंद्र चिकटे, सभापती बाजार समिती वरोरा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी