शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

घरात शौचालय, तरीही नागरिक उघड्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:24 IST

Chandrapur : गावखेड्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क वासेरा : शासनाने ग्रामीण भागात 'स्वच्छ भारत मिशन' राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून शौचालय बांधून दिले. मात्र, आजही घरात शौचालय असताना सिंदेवाही तालुक्यातील गावखेड्यांत महिला, पुरुष हे उघड्यावर शौचास जाताना दिसतात. तर शौचालयात काड्या, गोवरी इत्यादी साहित्य ठेवलेले आढळते. परिणामी ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

गतकाळात शासनाने हागणदारीमुक्तीचा नारा देत सर्वत्र जनजागृती केली. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले. शासनाने कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. तसेच ग्रामीण भागात पंचायत समिती व ग्रामपंचायतींतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली. या पथकांद्वारे रोज फेरफटका मारून जनतेमध्ये जनजागृती करत आवश्यक सूचना केल्या. त्यासाठी हागणदारीमुक्त गावांना पुरस्कृतही करण्यात आले. पण हे अभियान काही दिवसांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते.

गुड मार्निंग पथके गेली कुठे?■ सद्यस्थितीत कोणत्याही गावात हागणदारीमुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात कुणीही अमलात आणताना दिसत नाही. तसेच कुठेही गुड मॉर्निंग पथक कार्यरत असल्याचे जाणवत नाही. त्यामुळेच की काय सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या दिव- सागणिक वाढत आहे.■ एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे स्वच्छता अभियानाचे व हाग- णदारीमुक्तीचे तीनतेरा वाजले आहेत. तेव्हा ग्रामीण भागात खरंच हागण- दारीमुक्ती करायची असेल, तर प्रशासनाला जोमाने आणि निरंतर काम करावे लागेल. जेणेकरून गावखेड्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानchandrapur-acचंद्रपूर