शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

२३ केंद्रातून अडीच हजार शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:29 AM

चंद्रपूर : मागीलवर्षी कोरोना संकट काळात गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयांत शिवभोजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. ...

चंद्रपूर : मागीलवर्षी कोरोना संकट काळात गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयांत शिवभोजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. ही योजना यापुढे ही सुरुच राहणार असून नागरिकांना पाच रुपयांत भोजन मिळणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ केंद्रातून अडीच हजार थाळींचे वितरण केले जात आहे. त्यामुळे पुन्हा सुरु झालेल्या मिनी लाॅकडाऊनमध्ये गरजूंना लाभ मिळणार आहे.

मागील वर्षी कोरोेनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता पुन्हा राज्य सरकारने शिवभोजन था‌ळी पाच रुपयांमध्येच वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोरोना संकटाने पुन्हा तोंड वर काढले आहे. अशावेळी गरीब नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांना जेवण करता यावे यासाठी पूर्वीप्रमाणे पाच रुपयांत थाळी देण्यात येणार आहे.

या थाळीमध्ये पोळी, भाजी, वरण, भात दिला जातो. मोलमजुरी करणारे मजूर, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळत आहे. आता मिनी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी गरजूंना या थाळीचा लाभ होणार आहे.

बाॅक्स

चंद्रपूर शहरात ६ केंद्र

जिल्ह्यात शिवभोजनचे २३ केंद्र असून चंद्रपूर शहरामध्ये सहा केंद्राच्या माध्यमातून शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. दरम्यान, बल्लारपूर, घुग्घुसमध्ये प्रत्येकी एक शिवभोजन केंद्र आहे.

बाॅक्स

अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे दणाणले धाबे

जिल्ह्यात २३ केंद्रातून शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील एका केंद्रातून शिवभोजन थाळी ऐवजी मसाला भात वितरित केला जात होता. या केंद्रावर अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे अन्य केंद्र संचालकांचे धाबे दणाणले.