शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

परिश्रमाची गरिबीवर मात; छोट्या गावातील दोन तरुण बनले अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 2:43 PM

छोट्याशा ओवाळा गावातील दोन तरुणांनी केली एमपीएससी क्रॅक

सावरगाव (चंद्रपूर) : अंगात चिकाटी,उरात प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि कष्ट उपसण्याची तयारी असली की मनुष्यासाठी कुठलेही काम अशक्य राहत नाही. हे सिद्ध करून दाखविले आहे, एका छोट्याशा गावच्या दोन जिगरबाज तरुणांनी. लोकेश शालिक मोहुर्ले व मोसम ज्ञानेश्वर मोहुर्ले अशी त्यांची नावे आहेत. दोघेही नागभीड तालुक्यातील ओवाळा या गावचे मूळ रहिवासी आहेत.

शालिक उष्टुजी मोहुर्ले या अत्यंत अल्प शेती असलेल्या शेतकऱ्याचा लोकेश मोहुर्ले हा मुलगा. घरची परिस्थिती बेताचीच. मात्र वडिलांनी कठोर कष्ट उपसून मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. लोकेश मोहुर्ले याचे दहावीपर्यंतचे शिक्षण जवळच्याच तळोधी (बा.) येथील लोक विद्यालयात झाले. त्यानंतर ब्रम्हपुरीच्या नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयात बारावी आणि डीआयइटी कॉलेज,चंद्रपूर येथून डी.एड. पूर्ण केले. नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून बीए पूर्ण करीत तो पुणे येथे भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गासाठी गेला. आणि सन २०१५ पासून त्याने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

सुरुवातीला यश मिळाले नाही. त्यानंतर मात्र त्यांनी सतत प्रयत्न करून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत ११ महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब मुख्य परीक्षा २०२१ च्या राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या पास करीत उत्तुंग यश मिळविले. आणि आता शासनाच्या ' राज्य कर निरीक्षक ' या पदावर ते रुजू झाले आहे.

मोसम ज्ञानेश्वर मोहुर्ले हा सुद्धा ज्ञानेश्वर श्रावण मोहुर्ले या गरीब शेतकऱ्याचा मुलगा. त्याने दाखवून दिले की प्रतिभेचा श्रीमंतीशी काहीही एक संबंध नाही. बालपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याने आयुष्य व्यतीत केले आहे.त्यामुळे बालपणापासूनच त्याला परिस्थितीची चांगली जाणीव आहे. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोक विद्यालय तळोधी(बा.) येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय तळोधी(बा) येथे बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आणि पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. यासाठी त्याने पुणे येथे लायब्ररीत अभ्यास केला. परिस्थिती बेताची असल्याने नागपूर येथेच पुढील शिक्षण घेतले.

एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु सुरुवातीला त्यालाही यश मिळू शकले नाही. मात्र त्यानंतर त्यांनी सतत प्रयत्न केले आणि केवळ मेहनतीच्या बळावर एमपीएससी ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून उत्तुंग यश मिळविले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब मुख्य परीक्षा २०२० च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आणि यात यश मिळवीत ' पोलिस उपनिरीक्षक ' या पदावर त्याने सिद्धता मिळविली.

ओवाळा गावाचा लौकिक वाढविला

नागभीड तालुक्यातील आडवळणावर असलेले ओवाळा हे छोटेशे गाव. या गावाची लोकसंख्या केवळ साडेतेराशे एवढीच आहे.शेती हाच या गावचा प्रमुख व्यवसाय. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून या दोन्ही तरुणांनी शिक्षणाची पायाभरणी केली. एमपीएससी परीक्षेत यश मिळविले. या संपूर्ण गावातून ' हे दोनच ' एकमेव अधिकारी ठरले. त्यांच्या या यशामुळे ओवाळा गावाचा ही लौकिक वाढला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMPSC examएमपीएससी परीक्षाchandrapur-acचंद्रपूर