शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:37 PM

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.

ठळक मुद्देदररोज किरकोळ अपघातएकाच मार्गावर दररोज मलमपट्टीमनपा व पालिकेचे नाममात्र लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.चंद्रपूर शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने चंद्रपूर शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगल ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोघांचा अपघातातमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना मातीमिश्रित साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरुन वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडून वाहनचालकांना त्रास होत होता. मात्र मागील पाच दिवस चंद्रपुरात संततधार पाऊस पडला. त्यामुळे डागडूजी केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहेत. मात्र अजूनही मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पक्क्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही.शिक्षिकेचा बळी घेतल्यानंतरही ते खड्डे जैसे थेशहरातील तुकूम रोेडवर असलेल्या वाहतूक कार्यालयासमोरील मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिसरात बँक, हॉटेल, पोलीस मुख्यालय, कृषी कार्यालये आहेत. नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅॅव्हल्स याठिकाणी लागत असतात. तसेच या मार्गाने दुर्गापूरकडून येणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडल्याने वाहन चालविताना अडचणीचा आहे. मागील महिन्यात या रस्त्यावर झालेल्या एका अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. दर नियमित लहान-सहान अपघात होत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.अरुंद रस्तेही डोकेदुखीचचंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाले. मात्र शहरातील रस्त्याची स्थिती जैसे-थै आहे. शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पार्किंगची समस्या जैसे-थे आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होते. त्यातही रस्त्याची दैना परिणामी वाहनचालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.शहरातील खड्डे बुजवा - शहर काँग्रेसचे आयुक्तांना निवेदनचंद्रपूर शहरातील रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी पाणी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, राजू दास, दिपक कटकोजवार, सुरेश आत्राम, विशाल दास आदी उपस्थित होते. पाणी गेल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ठिय्या आंदोलन व होम हवन करण्याच्या इशारा त्यांनी दिला.मणक्याच्या व पाठीच्या आजारात वाढचंद्रपूर शहर हे संपूर्ण राज्यात प्रदूषीत शहर म्हणून अग्रस्थानी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र आता शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे नियमीत वाहन चालविणाºया वाहनचालकांना पाठीच्या व मणक्याच्या आजार घडत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त होत आहे.