शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

अज्ञात रोगाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका

By admin | Published: September 20, 2016 12:45 AM

कापूस पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे.

गोवरी : कापूस पिकांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. फळधारणेवर आलेल्या कपाशीला बाधा झाल्याने पिकांची तर वाढ खुंटलीच. परंतु संपूर्ण पिक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीपुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला असून शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्हा तर नेहमीच कापूस उत्पादनात अग्रेसर असतो. कापूस हे नगदी पिक असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. सध्या कपाशीचे पीक फळधारणेवर आले आहे. दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकांना वाढविले आहे. मात्र त्याच पिकांवर आता अज्ञात रोगाचा विळखा पडला आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी-चिंचोली परिसरात कपाशीवर अज्ञात रोगाने कहर केला आहे तर गोवरी येथील तुळशीराम जुनघरी या शेतकऱ्यांचा शेतातील दोन एकरातील कपाशीचे पीक अज्ञात रोगाने उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कपाशीवरील रोग हटविण्यासाठी अनेकदा कपाशीवर फवारणी केली. मात्र अज्ञात रोगापासून कपाशीची सुटका झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.कपाशीवर चूरडा व अन्य रोगांनी अतिक्रमण केले आहे. कपाशीला अज्ञात रोगांनी ग्रासल्याने कपाशीची वाढ पूर्णत: खुंटली आहे. महागड्या औषधाची फवारणी करून कपाशी पिकाला वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. मात्र पिकांवरील रोग हटण्याची कोणतेच चिन्ह दिसत नाही. शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळत चालला आहे. अस्मानी सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी पूरता कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांची सारी भिस्त कपाशीवर आहे. (वार्ताहर)कृषी विभागानेशेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेकपाशीच्या पिकावर अज्ञात रोगाचे थैमान व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांना त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास कपाशीचे पीक वाचविता येऊ शकते.कपाशीवर सध्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अज्ञात रोग व अळीने अतिक्रमण केल्यामुळे किटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. परंतु कपाशीवर त्याचा फारसा परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे.- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी