शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सेवा हक्क कायद्याचा वापर सर्वसामान्यांमध्ये रुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 9:59 PM

सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.

ठळक मुद्देस्वाधीन क्षत्रिय : जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामान्य जनतेमध्ये पारंपारिक पद्धतीने काम करणारी प्रशासन व्यवस्था रुजली आहे. त्यामुळे आॅनलाईन व्यवस्थेकडे सेवा हक्क कायदयाच्यामार्फत सर्व सामान्य जनतेला वळविताना या कायद्याचे फायदे, येणारे अडथळे व ही यंत्रणा पूर्णता कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात बदलणारे प्रशासन याबाबतची माहिती सर्वसामान्य जनतेला झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले.चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी लोकसेवा हक्क आयोगाच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्येक कार्यालयात कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते, याबाबतचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सुरुवातीला सादरीकरण केले.जिल्ह्यांमध्ये वरोºयापासून सुरू झालेल्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यामध्ये प्रशासकीय सेवा प्रदान करताना झालेले बदल व आलेल्या अडचणी याबाबतची मांडणी केली. यानंतर प्रत्येक विभागाने सेवा हक्क आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करताना नागरिकांना सुविधा देताना येत असलेल्या अडचणी बाबतही माहिती दिली. तर विविध विभागांच्या आॅनलाईन अंमलबजावणीमध्ये येणाºया अडचणीबाबत आयुक्तांनी बैठकीमध्ये माहिती जाणून घेतली.५०० सेवांची सुविधा मिळणारलोकसेवा हक्क कायद्यान्वये आगामी काळात ५०० सेवांची सुविधा सामान्य नागरिकांना प्रत्येक केंद्रावर दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २२ लाख लोकांना जवळपास १ हजार केंद्राच्या माध्यमातून विविध सुविधा पोहोचविल्या जातात. यामध्ये सेतू केंद्र, सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांचा समावेश आहे.