शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गावोगावी शेणखत व दुधाची टंचाई

By admin | Published: May 11, 2017 12:41 AM

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत.

सिंदेवाही तालुका : चाराटंचाईमुळे पशुधनात मोठी घटलोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली असून चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना विक्रीस काढत आहेत. त्यामुळे शेतीसाठी लागणारे शेणखत व दुध टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.देशातील ७५ टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशगातीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलाच ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत आहेत. दुसरीकडे शेतमजुराच्या मजुरीत पाचपटीने वाढ झाली आहे. यामुळे शेती करणे धान उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलाचा गोठा असायचा. त्या गोठ्यात बैल व गाय दिसत हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाल्याने बैलाचे मोठे दिसेनासे झाले आहे. पूर्वी जंगलात जनावरांसाठी कुरण राखूनठेवायचे. आत कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळत दुध, दही, लोणी, तुप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते.सोबत शेणखत तयार होत होते. शेतातील पिकाचे उत्पादन वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता मात्र गावात जनावर कळप राखायला गुराखी मिळत नाही.चाऱ्याचे जंगल सपाटसध्या सर्वत्र जंगले विरळ होत आहेत. अवैध वृक्षतोडीला उद्याण आले आहे. परिणामी जंगले कमी होत असून जनावराला हिवरा चारा मिळणे कठीण झाले आहे. जंगलात चाराच उपल्ध नसल्याने जनावरांना कुठे चारावे, असा प्रश्न पशुपालकांना पडत आहे. त्यातही काही जंगलावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारक तथे शेती करतात. अतिक्रमणधारक शेतकरी गावातील जनावरांना येथे चरण्यासाठी येऊ देत नाहीत. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.पिशवीच्या दूधाला प्राधान्यग्रामीण भागात दूध मिळत नसल्यामुळे नाईलाजाने फ्लॉस्टिक पिशवीमधील दूध विकत घ्यावे लागत आहे. नवजात बालकांनाही गायी, म्हशीचे दूध मिळणे अशक्य झाले आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडे पशु वृद्धीसाठी विविध योजना आहेत. त्यात दुधाळू जनावरे वाटपाची योजना आहे. तथापि शेतकऱ्यांकडे चारा पाणी उपलब्ध नसल्याने या योजनेचा लाभ घेण्याची हिमत शेतकरी दाखवित नाहीत.