शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

गावे महाराष्ट्राची; विकास कामे तेलंगणची

By admin | Published: May 11, 2017 12:35 AM

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे,...

नागपूर खंडपीठाचा निर्णय : वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्राचीच फारुख शेख । लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे, असा निर्णय नागपूर- खंडपीठाने दिला. असे असतानाही या गावात तेलंगणा सरकारने विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे.जिवती तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या वादग्रस्त गावापैकी एक आहे पुडियाल मोहदा. या गावाची लोकसंख्या ४०० आहे. येथे शासकीय विहीर एक, बोअरवेल एक आहे. बोअरवेल बंद अवस्थेत असून विहीरही कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावापासून तालुका मुख्यालय १६ किमी तर तेलंगणातील मंडळ केरामेरी २० किमी अंतरावर आहे. गावात आतापर्यंत एसटी पोहचलेली नाही. गावात विद्युत खांब टाकून तीन ते चार वर्ष लोटले असून विद्युत पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. उलट या गावात तेलंगणा राज्यातील विद्युत पुरवठा चालू आहे.१४ वादग्रस्त गावे ही महाराष्ट्राची असूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे तर तेलंगणा राज्याने मात्र विकास कामाचा सपाटा सुरू केला आहे. या गावांची मुख्य समस्या पिण्याचे पाणी आहे. तेलंगणा शासन तीन कोटी खर्चून पाण्याची टाकी उभारत आहे. यामुळे भोलापठार, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, रोझापूर, नारायणगुडा या गावांना पाणी मिळणार आहे. मात्र येथील नागरिकांना महाराष्ट्रातच राहायचे असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारच्या योजना व विकास कामे हवी आहेत.दरम्यान, पुडियाल मोहदा ग्रामपंचायतीच्या सदस्य लक्ष्मीबाई बाबूजी कोटुले, वाघुजी कोंडीबा कोटुळे, शामराव भुरकुटे, सखाराम मिरासे, मारोती कोटुळे यांनी आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे असून पिण्याचे पाणी, विद्युत मीटरसाठी जिवती येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणताच अधिकारी व नेते गावात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.