शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:31 IST

पावसामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या जलपातळीत वाढ

चंद्रपूर : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची झळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदी फुगली. बॅकवॉटर नाल्या काठावरील शेतात शिरल्याने काही गावांची पिके पाण्याखाली आली. पावसाचा जोर वाढल्यास मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अजूनही पावसाचा जोर नाही. मात्र, शनिवारपासून नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात पावसाने जोर पकडला. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. नागभीड तालुक्यातील बाह्मणी, बोथली, कोटगाव, पेंढरी, मांगली, देवपायली, बोंड, राजुली, बाळापूर, पारडी या गावांत शनिवारी पाणी शिरले. नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावही पाण्याखाली आले होते. संततधार पावसाने वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोसेखुर्दचे सर्व दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. पावसाचा जोर राहिला तर सर्वच नदी नाल्यांना पूर येऊ शकतो.

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ३७३४.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

महसूल पथकाकडून पाहणी

रविवारी चिमूर, नागभीड, सिंदेवाही तालुक्यांतील पुराने काही गावांचे नुकसान झाले. शंकरपूर-येथून जवळच असलेल्या पांजरेपार गावाला शनिवारच्या रात्री आलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. २० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पांजरेपार हे सहाशे लोक वस्तीचे गाव असून गावाजवळूनच नाला वाहतो. शनिवारी रात्री नाल्याला पूर आला. सोमवारी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.

उमा नदीपुलावरून पाणी

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज-जुनगाव येथील नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. मात्र काही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्याने मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पथक दाखल होऊन या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज नागभीड तालुक्यात सर्वाधिक ४२. ६ मिमी तर जिल्ह्यात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली.

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. घोडाझरी धरणाच्या केवळ सांडव्यातून पाणी सोडणे सुरू आहे.

- श्याम काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपूर

टॅग्स :RainपाऊसfloodपूरriverनदीGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पDamधरण