शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:47 PM

जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामावर संकट : बल्लारपूर तालुक्यात धान व कापूस पीक धोक्यात

अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. मात्र निसर्गाची हुलकावणी सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.बल्लारपूर तालुक्याचे सरासरी ११३२ मिमी पर्जन्यामान आहे. मागील वर्षी तालुक्यात केवळ ४१.८७ टक्केच पाऊ स पडला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामावर विपरीत परिणाम झाला आणि बळीराजा आर्थिक संकटात ओढला गेला. यावर्षी देखील तालुक्यातील शेतकºयांवर अरिष्ठ ओढावल्याचे चिन्ह दिसत आहे. आजतागायत तालुक्यात ६३४.४ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही शेतशिवार कोरडे आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.तालुक्याचे कृषी क्षेत्र कोरडवाहू असल्याने सिंचन सुविधाचा अभाव आहे. नाममात्र शेतकºयांकडे ओलीताची सोय असली तरी मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचे कृषी व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने हुलकावणी देण्यास सुरूवात केली. यामुळे शेतकरी गतवर्षीच्या संकटातून सावरण्याऐवजी पुन्हा संकटाच्या मार्गावरून वाटचाल करीत आहे.शेती व्यवसाय दरवर्षी तोट्यात जातोे. तरीही शेतकरी उत्पादनासाठी जीव ओतून राबतो. पीक कर्जाचा अडथळा पार करून काहींनी कर्ज घेतले. काहींनी सावकाराकडून कर्ज घेत बी-बियाण्यांची व खताची तरतूद केली. मशागत केलेल्या शेतात पेरणी केली. मात्र निस२र्गाची साथ बळीराजाला मिळत नसल्याने हिरवेगार पीक करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी येत आहे.७ हजार ११५ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड७ हजार ११५ क्षेत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये २ हजार ३९० हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली. कापसाचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र ३ हजार ९८२ हेक्टर इतके आहे. सोयाबीन १२८ हेक्टरमध्ये लागवड असून गळीत धान्य १२८, हळद ९.३०, मिरची ८ व भाजीपाला १०७ हेक्टरमध्ये लावण्यात आले आहे.