शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

चंद्रपुरातील पाणी पेटणार

By admin | Published: May 14, 2017 12:31 AM

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक वॉर्डात टंचाई : सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी दंड थोपटलेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाविरोधात दंड थोटपले आहे. अयोध्या नगर, हनुमान नगर, सुमित्रनगर, दत्त नगर, आदी विविध भागांत गेल्या पाच वर्षांपासून व्यवस्थित पाणी पोहोचत नाही. वडगाव, डॉ. आंबेडकर नगर, बाबुपेठ आदी भागातही पाण्याचा प्रश्न आहे. मनपाच्या नवीन पदाधिकाऱ्यांपुढे पाण्याचा पेच निर्माण झाला आहे. तीन आठवड्यानंतर मान्सून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर शहरात शनिवारी मान्सूनपूर्व धारा बरसल्या आहेत. उन्हाळा संपायला आला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या मार्च महिन्यात सुमित्र नगर, हनुमान नगर, अयोध्या नगर येथील नागरिकांनी नळाचे पाणी मिळत नसल्याची तक्रार केली होती. गेल्या पाच वर्षांपासून पाणीपट्टी भरतो, तरी पाणी का मिळत नाही, असा टाहो नागरिकांनी फोडला होता. तसेच एकोरी वॉर्ड, भिवापूर, बाबुपेठ, डॉ. आंबेडकर नगर, इंडस्ट्रियल वॉर्ड, वडगाव आदी परिसरातही नियमित पाणीपुरवठा होत नाही.आता या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहेत. शहराच्या सर्वच भागात समान पातळीवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्याबाबत २०१३पासून तक्रारी करण्यात येत आहेत. चंद्रपूर शहराला मनपाने पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शनकडे आहे. या कंपनीच्या विरोधात सुमित्र नगर, महेश नगर येथील नागरिकांनी तक्रार केली.सत्ताधारी नगरसेवक करणार उपोषणनगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी दे. गो. तुकूम प्रभागात येणाऱ्या विविध भागातील नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसल्याचे पत्र मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना दिले. त्यावर शहर अभियंता महेश बारई यांनी ८ मे रोजी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला तक्रारीचे निराकरण करण्याचे आदेश दिले. पत्र प्राप्त होताच या भागांमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्याप पाणी समस्या आहे. त्यामुळे नगरसेवक कासनगोट्टूवार यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.पाणी प्रश्नावर बसपा व शहर आघाडी आक्रमकशहराच्या अनेक भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगून बसपा व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मनपाची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे केली आहे. वडगावसह विविव वॉर्डांमध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जटपुरा गेट प्रभागातील जलनगर वॉर्डात सुहाना शेख या दीड वर्षीय मुलीचा नालीत पडून मृत्यू झाला. बसपाचे गटनेते अनिल रामटेके, पितांबर कश्यप, बंटी परचाके आणि शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख आदींनी महापौरांची भेट घेऊन मागणी केली आहे.