शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

२०० गावांचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:23 PM

जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची देयके थकीत : जि.प.चे दुर्लक्ष

शशीकांत गणवीर ।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभालची जबाबदारी कंत्राटदारांकडे देण्यात आली. करारानुसार या योजनेची मूदत ३१ मार्च २०१८ ला संपूनही मुदतवाढ देण्यात आली नाही.तेव्हापासून कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता सुरू आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेऊन कंत्राटदारांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत चालु ठेवला. मात्र सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांतील सर्व प्रादेशिक योजनांची अंतिम देयके कंत्राटदारांना अजूनपर्यंत देण्यात आले नाही.कंत्राटदारांनी केला होता पाठपुरावायाबाबत कंत्राटदारांनी जिल्हा परिषदचे पदाधिकारी व संबंधित विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र या पत्रांचा काहीही उपयोग झाला नाही. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाकपणा केला. त्यामुळे कंत्राटदारांकडे कार्यरत असणाºया कामगारांचे वेतन, ब्लिचिंग पावडर खरेदी करणे, पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्तीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला. या गंभीर प्रश्नाकडे जि. प. ने दुर्लक्ष केल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.३५ योजनाही बंदजिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता दोनशे गावांकरिता जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या ३५ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांची देखभाल दुरूस्ती, ब्लिचिंग टाकणे, कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतकडे पाणीकर थकित असल्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. निधी नसल्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाही. निधीची तरतूद करून सर्व गावांचा पाणी पुरवठा सुरू होईल, यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.-टी. सी. पिपरे, कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. चंद्रपूर