शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनवू

By admin | Published: July 26, 2016 1:04 AM

जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे.

सुधीर मुनगंटीवार : पोंभूर्णा इको-पार्कच्या भिंतीचे भूमिपूजनचंद्रपूर : जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे. वृक्ष लागवडीला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील उघड्या टेकड्या हिरव्यागार करण्याच्या प्रयत्न असून वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा येथे इको-पार्कच्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. वनविभागाच्या कोणत्याही कामाचे भुमिपूजन किंवा शुभारंभ विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या हाताने करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी वामन गेडाम व तानाजी रोहनकर यांच्या हस्ते झाले असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस केली.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, पोंभुर्णाचे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, जिल्हा परिषद सदस्य अल्का आत्राम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आदी उपस्थित होते.पोंभुर्णा शहरानजीक खनिज विकास निधीतून ९ हेक्टरवर २ कोटी ८३ लक्ष खर्च करून सदर पार्क तयार करण्यात येणार आहे. सदर पार्क वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. राज्यभर वनविभागाची मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे. या संपत्तीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होवू शकतो, परंतु त्यादृष्टीने यापुर्वी प्रयत्नच केले गेले नाही. आता मात्र यावर भर दिला जात असून तसे नियोजनही केल्या जात आहे. पोंभुर्णा ते आक्सापूर हा राज्यातील अत्याधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता होणार असल्याचेही ते म्हणाले. पोंभुर्णा येथे पहिले टेलीमेडीसीन केंद्र बनविण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तुळशीराम दुधकोर या तेंदु मजूरास धनादेशाचे वितरण करण्यात आले. पार्क परिसराची पाहणी करून पालकमंत्र्यांनी वृक्षारोपनही केले. (स्थानिक प्रतिनिधी)तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानेजिल्ह्यात तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानाची निर्मिती केली जात आहे. पोंभुर्णासह तीन ठिकाणी इको-पार्क तयार केले जात आहे. बॉटनिकल गार्डनचाही प्रस्ताव आहे. जिल्ह्यात जैवविविधतेचा अभ्यास करणारे उद्याने निर्माण केली जाणार आहे. निसर्गाने दिलेल्या जैवविविधतेचे जिल्हा ज्ञानसाधना केंद्र बनतील, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.