शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

ताडोबातील २९ वाघांचे काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 4:46 AM

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ९१ वाघ आढळले असताना यंदा ६२ वाघांचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाने दिल्याने व्याघ्र गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

मिलिंद कीर्ती। लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी वन्यजीव गणनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ९१ वाघ आढळले असताना यंदा ६२ वाघांचे दर्शन झाल्याची माहिती वनविभागाने दिल्याने व्याघ्र गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे ही गणना योग्य असेल तर २९ वाघ गेले कोठे, असा सवाल विचारला जात आहे. राज्यातील वन्यप्राण्यांची बुधवारी गणना करण्यात आली. ताडोबातील वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी कोर झोनमध्ये ८२ व बफर झोनमध्ये १०९ मचाणी उभारण्यात आल्या होत्या. पाणवठ्यावरील प्राण्यांच्या नोंदीनुसार ६२ वाघ व १९ बिबट आढळून आले. गेल्या वर्षीच्या गणनेत ताडोबामध्ये ९१ पेक्षा अधिक वाघ आढळून आल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक जी. पी. गरड यांनी दिली. यंदा २९ वाघांची घट दिसून येत आहे. ही घट खरी असेल तर अन्य वाघांचे काय झाले, अशी शंका व्यक्त होत आहे. ताडोबामध्ये बुधवारच्या वन्यजीव गणनेत सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमी आणि व्याघ्र क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सर्वाधिक ७०० अर्ज केले. प्रत्यक्षात केवळ १५० युवकांना सहभागी करण्यात आले. तर बफर झोनसाठी ४०० व्यक्तींसाठी २०० अर्ज आले. त्यापैकी पुणे, मुंबई, नागपूरमधील बहुसंख्य लोकांना वन्यजीव गणनेची कोणतीही तांत्रिक माहिती नव्हती. अप्रशिक्षित लोकांनी वाघांची नोंद व्यवस्थित न केली असण्याची शक्यता अधिक आहे.वन्यजीव गणनेत प्रगणकांना ६२ वाघांचे दर्शन झाले आहे. ताडोबाच्या कोर व बफर झोनमध्ये गेल्या वर्षीपेक्षा मचाणी कमी होत्या. त्यामुळे वाघाची नोंद कमी झाली आहे. ताडोबामध्ये वाघांची संख्या कायम आहे. ते कमी झाले, असे म्हणता येत नाही.- जी. पी. गरड, मुख्य वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.