शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

हाताला काम देणाऱ्या उद्योगांची कुणी अडवली वाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:21 IST

उद्योगांची स्थिती बिकट : निवडणूक प्रचारात मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : उद्योग जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख असली तरी बेरोजगारांच्या हाताला काम देणाया उद्योगांना अजूनही बूस्टर मिळाले नाही. स्थिर झालेल्या उद्योगांत काही प्रमाणात रोजगार मिळाला. मात्र, बेरोजगारांचे वाढते तांडे आणि सरकारी अर्थबळाअभावी खालावत चालेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक रोजगाराचा प्रश्न प्रचारात ऐरणीवर येणार काय, याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर हे नागपूरनंतर औद्योगिकदृष्ट्या दुसरे महत्त्वाचे शहर आहे. वेकोलि, सिमेंट कारखाने, वीजप्रकल्प असल्याने त्यावर आधारित छोटे उद्योग सुरू झाले. पण, उद्योगांचा विकास अपेक्षित होऊ होऊ शकला नाही. २७ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीजप्रकल्पाचा प्रश्न सुटलानाही. आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमा जवळ असल्याने उद्योजकांची चंद्रपूरला गुंतवणुकीसाठी पसंती मिळते. वेकोलि, सिमेंट कारखाने, वीजप्रकल्प असल्याने त्यावर आधारित छोटे उद्योग सुरू झाले. पण, मागील काही वर्षात उद्योगांचा विकास अपेक्षित होऊ होऊ शकला नाही. रोजगाराच्या आशा मावळल्या. चंद्रपूर एमआयडीसीतील काही उद्योगांचा अपवाद वगळल्यास तालुकास्तरावरील एमआयडीसी नावापुरत्याच राहिल्या आहेत. 

एमआयडीसीत उरले केवळ भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या क्षेत्रात अनेकांनी उद्योगांसाठी भूखंड ताब्यात घेतले. मात्र, पायाभूत, सुविधा, बँकांकडून अर्थपुरवठा तसेच कच्चा मालाचा अभाव आणि वाढत्या वीजदराने अनेक उद्योगांनी गाशा गुंडाळला. 

उद्योगांची संख्या घटली एमआयडीसीत काही वर्षापूर्वी उद्योगांची संख्या २५० पेक्षा होती. ती आता ८० वर आली आहे. बंद पडलेल्या उद्योगांना राज्य सरकारने बूस्टर पुरविण्याचे धोरण राबविले नाही. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती खुंटली. कौशल्यप्राप्त सुशिक्षित बेरोजगारांनी सुरु केलेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांनाही बळ मिळत नसल्याने शेवटच्या घटका मोजत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केवळ राजकीय चिखलफेक करण्याऐवजी हे ज्वलंत प्रश्न चर्चेत आणले पाहिजे, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.

जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्तही निराश पिपरी, डोरवासा, तेलवासा, कुंनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणार रिठ, रुयाल तीठ व चिरादेवी या गावातील शेतकऱ्यांची ११८३.२३ हेक्टर शेतजमीन १९९४-९५ मध्ये निप्पॉन डेन्ड्रो वीजप्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. भद्रावती शहरापासून ही जागा सात किलोमीटर अंतरावर आहे. कोळसा, वर्धा नदीचे मुबलक पाणी, रेल्वे ट्रॅक, वीज साठविण्यासाठी पॉवर ग्रीड, जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, हा प्रकल्प मार्गी लागला नाही. प्रकल्पात जमिनी जाऊनही वाट्याला काहीही आले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्येही निराशा आहे. याशिवाय, सहाही विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या उद्योगांचे काय झाले, हाही प्रश्न युवक विचारत आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीchandrapur-acचंद्रपूर