शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

देशातील २० कोटी तरुणांना मिळणार काम

By admin | Published: September 23, 2015 4:52 AM

देशात वाढत चाललेल्या बेरोजगारावर मात करण्यासाठी मोदी सरकारने गंभीरपणाने विचार सुरू केला असून उद्योगातून

मूल : देशात वाढत चाललेल्या बेरोजगारावर मात करण्यासाठी मोदी सरकारने गंभीरपणाने विचार सुरू केला असून उद्योगातून रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा लाभ देशातील २० कोटी तरुणांना होणार असून त्यांच्या हाताला काम मिळून ते आत्मनिर्भर करण्याचा सरकारचे प्रयत्न असल्याचे मत कें़द्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. मूल तालुका पत्रकार संघाशी ‘संवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नगरसेवक मोती टहलियानी, प्रभाकर भोयर, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, प्रशांत लाडवे, अनिल संतोषवार, अनिल साखरकर, सुनील आयलनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. अहीर म्हणाले, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एका वर्षात सात हजार कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे. खतांचे पुढील चार वर्षे भाव वाढणार नाही, असा धाडसी निर्णय सुद्धा केंद्र शासनाने घेतला आहे. देशाला ३०० लाख टन युरियाची गरज आहे. आपल्या देशात २३० टन युरिया तयार होत असून उर्वरित चीन, रशिया या देशातून आयात केला जातो. यावेळी सरकारने निमकोटेट युरियाची निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे युरियाची इतर पदार्थात भेसळ केली जाणार नाही.बेरोजगारांनी मदत करून कौशल्य विकासातून उद्योग निर्माण करण्याचा व बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. देशातील तरुणांना काम, निर्भत्सना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. शासनाने शेतकऱ्याच्या हितार्थ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निर्माण केली असून यातून शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होईल. याचबरोबर राज्य शासनाने देखील जलयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ केल्याने केंद्र व राज्य शासनाची सिंचनाची योजना शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. मात्र गरिबी हटली नाही यासाठी काँग्रेसकडे गरीबांचे धोरण आखले नव्हते. गरिबीचे मुळ कारण बेरोजगारी असल्याने बेरोजगारांना काम दिल्यास आपोआपच गरीबीचे निर्मूलन होण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार संघातर्फे संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी ना. हंसराज अहीर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)भूमी अधिग्रहण कायद्यात बदलभूमी अधिग्रहण कायदा हा १८९४ चा इंग्रजकालीन होता. त्यात बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. भाजपा सरकारने चार पट मोबदला व एकास नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सव्वा लाख भूमी अधिग्रहीत करुन लाखो कुटुंबाची तत्कालीन सरकारने लूट केल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.