शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

राज्य सरकारच्या विरोधात कामगार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 11:55 PM

राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली.

ठळक मुद्देचंद्रपुरात जेलभरो आंदोलन : शेकडो महिला व पुरूष कामगारांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर येथे सभा झाली. सभेनंतर शेकडो कामगारांनी जेलभरो आंदोलन करून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.मोर्चाचे नेतृत्व प्रा. रमेशचंद्र दहीवडे, प्रल्हाद वाघमारे, वामन बुटले व प्रमोद गोडघाटे यांनी केले. आंदोलनकर्ते कामगार गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडकले. त्यानंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात कामगारांनी रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले. यात लोकशाही आघाडीचे अंकुश वाघमारे, किशोर पोतनवार, शेख मैकु शहाबुद्दीन, नामदेव कन्नाके, रामसिंह सोहेल, हिराचंद बोरकुटे, प्रा.माधव गुरनुले, अन्वरभाई आलम मिर्झा, अय्युबभाई कच्ची, गोविंद मित्रा, शंकर सोगोरे, पी. एम. जाधव आदींनी जेलभरो आंदोलनाला समर्थन दिला.या जेलभरो आंदोलनात वनजमिनीवर अतिक्रमण करून जमीन कसत असलेले जबरानज्योत शेतकरी, मलेरिया कामगार, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत वनमजूर, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी महिला-पुरूष, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पोषण आहार शिजवणाऱ्या महिला, ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आशा वर्कर, खासगी कार्यालयात कार्यरत कंत्राटी  कामगार, संगठित उद्योग कोलमाइन्सचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्याजबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे द्यावे, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून खर्चावर ५० टक्के नफा असा हमीभाव द्यावा, ६० वर्षावरील सर्व कष्टकऱ्यांना किमान पाच हजार रुपये पेंशन द्यावे, सर्व असंघटीत कामगारांना किमान वेतन १८ हजार रुपये वेतन द्यावे, खाजगीकरणाचा विरोध, ठेकेदारी पद्धती बंद करा, लोकसभा निवडणुकीतील आश्वासनाची अंमलबजावणी करा आदी मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले.    गटप्रवर्तक व आशा वर्करचे धरणे नागभीड : आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी धरणे आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी राबवावे, किमान वेतन १८ हजार तसेच ३ हजार रुपये पेंशन देण्यात यावी, दवाखान्यांचे खाजगीकरण बंद करण्यात यावे, अशा २६ मांगण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात सुनंदा मुलमुले, दुशाली खोब्रागडे, स्मिता कुंभरे, विद्या जांभूळे, हेमलता नाकाडे, सपना खोब्रागडे, दर्शना मेश्राम, कल्पना मेश्राम यांचा समावेश होता.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMorchaमोर्चा