शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

कार्यक्षेत्राच्या अटींचा बळीराजाला फास

By admin | Published: September 21, 2015 12:47 AM

परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला.

सावकाराची कर्जमुक्ती फसवी : ६४ पैकी सहा पात्र, जाचक अटीने केला शेतकऱ्यांचा घातचंद्रपूर : परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला. मात्र, पात्रतेचे निकाल जटील असल्याने तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, केवळ परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राच्या अटीमुळे अद्याप ५८ शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी कर्जाचा फास कायम आहे.शासननिर्णय आल्यानंतर सहायक निबंधक सहकारी कार्यालयाने तालुक्यातील १९ परवानाधारक सावकारांना कर्जदार शेतकऱ्यांची यादी मागितली. त्यातील ११ सावकारांनी तालुक्यातील ७२ गावांतील ४१० कर्जदारांची यादी निबंधक कार्यालयाला दिली. त्यापैकी ६४ कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असल्याची अंतिम माहिती तलाठी कार्यालयात पाठविली. अंतिम छानणीत ६४ शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र, शासननिर्णयानुसार परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज दिले होते. त्यामुळे या योजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरणार नाही, अशी अट होती. त्यामुळे केवळ ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. वरोरा तालुक्यात १९ परवानाधारक सावकार आहेत. त्यातील काही सावकारांचा परवाना शहरापुरता मर्यादित आहे. काहींचा तालुक्यातील विशिष्ट गावापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे बाजूच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने कार्यक्षेत्र ठरलेल्या सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास ते अपात्र ठरत आहे.या कर्जमाफी योजनेसाठी शेगाव येथील दोन परवानाधारक सावकाराकडून सहा शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज पात्र ठरले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे व्याजासह एक लाख २१ हजार ४०१ रुपये आता माफ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)अट रद्द कराशेतकरी हा जवळ असलेल्या बाजारपेठेत आपला शेतमाल विकत असतो. तेथूनच तो कर्जाची उचल करीत असतो. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी वरोरा बाजारपेठेत माल विकत असतात. वरोरा येथील सावकारांकडून कर्ज घेत असतात. त्यामुळे शासनाने कर्जमाफीसाठी परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राची अट रद्द करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे. .