शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही द्यावीत - डॉ. वि. स. जाेग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 10:56 IST

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

चंद्रपूर (शांताराम पोटदुखे साहित्य परिसर) : केवळ प्रश्नार्थक साहित्य हे अपूर्ण साहित्य आहे. सरधोपट पोथीनिष्ठ सकारात्मक साहित्य हेही अपूर्ण आहे. त्यामुळे साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही दिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि. स. जोग यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ व सूर्यांश साहित्य-सांस्कृतिक मंचद्वारा आयोजित चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहातील ६८ व्या तीन दिवसीय विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून शुक्रवारी ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर प्रमुख पाहुणे आमदार अभिजित वंजारी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ॲड. फिरदोस मिर्झा, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम काळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, माजी आमदार सुदर्शन निमकर, संरक्षक प्रशांत पोटदुखे व मान्यवर उपस्थित होते.

६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'वर राजकारणी बोलले; साहित्यिक मात्र गप्प

संमेलनाध्यक्ष डॉ. जोग म्हणाले, राजकीय व्यक्तींवर अकारण टीका करणारा साहित्यिक मी नाही. वयाच्या १२ व्या वर्षांपासून राजकीय आंदोलन व साहित्य लेखन या दोन्ही गोष्टी करीत आलो. लेखकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरे दिली पाहिजे. ही उत्तरे गांधीवाद, आंबेडकरवाद, राष्ट्रवादाच्या कुठल्याही वादाच्या आधारे असू शकतात, असेही संमेलनाध्यक्ष डॉ. जोग म्हणाले. प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर तर संचालन डॉ. रमा गोळवलकर यांनी केले.

मने जोडते तेच खरे साहित्य - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरला संमेलन होणे आनंदाची घटना आहे. दु:खमुक्तीचा मार्ग दाखविते, मने व समाज जोडते हेच खरे साहित्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटनीय भाषणात केले. अलिकडे पुस्तके विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या घटू लागल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. मानसिक प्रदूषण दूर करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे ठरते. दर्जेदार साहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहोचेल हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार नव्या पद्धतीने पुस्तके आली पाहिजे. यापूर्वी राज्याचे सांस्कृतिक खाते अत्यंत लहान वाटते. परंतु हे खाते परीस आहे. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, असेही मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यVidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघchandrapur-acचंद्रपूर