शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

२७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर निवृत्तांना प्रत्येकी १० लाख भरपायी; वनमजुरांच्या संघर्षाचे फलित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 5:23 PM

सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले.

छत्रपती संभाजीनगर : सुमारे तीन दशके सेवा बजावलेल्या याचिकाकर्त्यांना अथवा त्यांच्या वारसांना निवृत्तीनंतर देय असलेले आर्थिक लाभ दिले नसल्यास, त्या लाभांऐवजी प्रत्येकी एकरकमी १० लाख रुपये भरपायी द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी वनविभागास दिला.

याचिककर्त्यांनी सलग २४० दिवस सेवा बजावली नसल्यामुळे आणि काही याचिकाकर्ते रोजगार हमी योजनेतील कामगार असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करून त्यांना आर्थिक लाभ देण्यास नकार दिला. यामुळे दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

भागवत पाटील व इतर वनमजुरांनी ॲड. बी. ए. दरक (धोंडराईकर) यांच्यामार्फत स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी नाशिक आणि जळगाव येथील औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांच्या तक्रारी अंशत: मंजूर करून वनखात्याने ‘अनुचित कामगार प्रथेचा’ अवलंब केल्याचा निष्कर्ष काढला. तक्रारदारांना ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर आर्थिक लाभ देण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध वनविभागाने खंडपीठात याचिका दाखल केली. सामाजिक वनीकरण हा उद्योग असल्याचा आणि अर्जदार रोजगार हमी योजनेचे कामगार असल्याचे वनविभाग सिद्ध करू शकला नसल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्या सेवा नियमित करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश दिला होता; परंतु सदर कामगार १९९६ आणि २०१२ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करीत नसल्याच्या कारणावरून शासनाने प्रस्ताव फेटाळले.

त्या नाराजीने कामगारांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. खंडपीठाने नाना पवार यांना ७ लाख ५० हजार आणि इतरांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशाच्या बजावणीत व रक्कम अदा करण्यात आचारसंहितेची बाधा येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ