शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

१०० कोटींच्या ठेवीही मोडण्याच्या हालचाली, सांगा स्मार्ट बस सेवा कशी चालेल? 

By मुजीब देवणीकर | Published: July 24, 2024 7:56 PM

शहर बससेवा तोट्यात चालते. हा तोटा भरून काढण्यासाठी अगोदर २०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या.

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीमार्फत पाच वर्षांपासून शहरात १०० बसेस सुरू आहेत. ही बससेवा अखंडितपणे सुरू राहावी यासाठी १०० कोटींच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या. या ठेवी मोडल्यानंतर बससेवा कशा पद्धतीने चालेल, याचा आराखडा सादर करण्याचे आदेश सोमवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.

शहर बससेवा तोट्यात चालते. हा तोटा भरून काढण्यासाठी अगोदर २०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या. या ठेवींवरील व्याजाच्या रकमेतून तोटा भरून काढला जात होता. दोन वर्षांपूर्वी ठेवी मोडून १०० कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी वापरण्यात आले. आता १०० कोटी बँकेत होते. या ठेवीची मुदत जून महिन्यात संपली. शासकीय अनुदानाची रक्कम ठेवीच्या स्वरूपात न ठेवता ती वापरली पाहिजे, अशी भूमिका सोमवारच्या आढावा बैठकीत जी. श्रीकांत यांनी मांडली. १०० कोटींची रक्कम विकास कामांमध्ये वापरली तर बससेवा कशी चालेल, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. बससेवा सक्षमपणे चालावी, यासाठी आराखडा सादर करण्याचे आदेश त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिले.

३६ कोटींच्या बसेसस्मार्ट सिटीने ३६ कोटी रुपये खर्च करून १०० डिझेल बसेस खरेदी केल्या. या बसेस शहरातील विविध मार्गांवर धावत आहेत. बसच्या तिकिटाचे दरही कमी आहेत. त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने या सेवेला प्राधान्य देतात.

दररोज २५ हजार प्रवासीशहरातील विविध मार्गांवर दररोज ९० बसेस धावतात. १० बसेस राखीव असतात. या बसेस ३०० पेक्षा अधिक फेऱ्या दिवसभरात पूर्ण करतात. २४ ते २५ हजार प्रवासी दररोज या सेवेचा लाभ घेतात.

तूट कशातून भागवणार? स्मार्ट सिटीची बससेवा दीर्घकाळ चालावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन अधिकाऱ्यांनी २०० कोटींच्या ठेवी बँकेत ठेवल्या. नंतर या ठेवी १०० कोटींवर आल्या. आता त्यासुद्धा मोडल्या जाणार आहेत. बससेवेत येणारी आर्थिक तूट कशी भरून निघेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

बससेवेचे मनपाकडे हस्तांतरणस्मार्ट सिटीने पाच वर्षे बससेवेचा प्रकल्प चालवून नंतर तो महापालिकेकडे हस्तांतरित करावा. हा प्रकल्प हस्तांतरित करताना काही भरघोस निधीही मनपाकडे वर्ग करावा, असे प्रारंभीच्या काळात ठरले होते. यासंदर्भात कोणतीही चर्चा सध्या झालेली नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका