शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी १०० टक्के अनुदान; किती जणांना मिळाली शेती?

By विजय सरवदे | Published: January 18, 2024 6:44 PM

जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते. परंतु योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरानुसारच जमीन खरेदी तरतूद असल्यामुळे बहुतांश शेतकरी या दरात जमीन विकायला तयार नाहीत. त्यामुळे समाज कल्याण विभागापुढे ही योजना राबविण्याचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. यानुसार भूमिहीन शेतमजुरांना १०० टक्के अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. दुर्दैव असे की, जमीन विक्री करणाऱ्यांचीच संख्या कमी होत आहे. सध्या कोरडवाहू शेतीचे दर बाजार भावानुसार १० ते १५ लाख रुपये प्रतिएकरपर्यंत पोहोचला आहे. प्रत्यक्षात या योजनेद्वारे ४ लाख दराने जमीन खरेदी करण्याचा निकष आहे. दुसरीकडे बागायती शेतीसाठी ७ लाखांपर्यंत खरेदीसाठी कमाल मर्यादा घालून दिली आहे. परिणामी, एवढ्या कमी किमतीत शेती विकण्यास कोणी तयार होत नसल्याचे चित्र आहे.

काय आहे योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे सामाजिक, आर्थिक जीवनमान उंचवावे, यासाठी ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन देण्याची या योजनेत तरतूद आहे.

योजनेचे निकष काय?या योजनेचा लाभार्थी हा अनु. जाती, नवबौद्ध घटकातील असावा. तो भूमिहीन शेतमजूर व दारिद्र्यरेषेखालील असावा, विधवा अथवा परितक्त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ द्यावा, खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीवर अतिक्रमण नसावे, जमीन कसन्यालायक असावी, असे या योजनेचे निकष आहेत.

भूमिहीन लाभार्थीला किती शेती मिळते?या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीला ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन मिळते.

अर्ज कोठे करायचा?या योजनेसाठी सहायक समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो.

१५ वर्षांपासून योजना राबविण्यात अडचणीया योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरानुसार जमीन खरेदी केली जाते. पण जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा हा दर परवडत नाही, हीच मोठी अडचण आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग