शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

११ कलमी कामांची योजना रखडली !

By admin | Published: January 15, 2017 1:03 AM

बीड : ग्रामीण भागाच्या विकासकामांतून रोजगारनिर्मिती करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या सुरुवातीलाच घरघर लागली आहे

बीड : ग्रामीण भागाच्या विकासकामांतून रोजगारनिर्मिती करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या सुरुवातीलाच घरघर लागली आहे. ११ प्रकारच्या कामांचा समावेश असलेल्या या योजनेतून जिल्ह्यात हजारो कामे करण्यास शासनाने परवागनी दिली आहे; परंतु प्रशासकीय अनास्थेमुळे दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एकाही कामाला सुरुवात झालेली नाही.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत ही कामे राबवायची आहेत. प्रलंबित कामे नव्या कामांत समाविष्ट करुन नरेगा आयुक्त अभय महाजन यांनी जिल्ह्याला कामांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा परिषद, महसूल विभाग, कृषी विभाग व वनविभागातर्फे ही कामे करायची आहेत. मात्र, अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत ही कामे राबविण्यात येणार असून, पंचायत समितीमार्फत जिल्हा कक्षाकडे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येणार आहेत. मात्र, प्रशासकीय मान्यतेचे घोडे पंचायत समिती स्तरावरच अडकलेले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडलेली आहे.