शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

जिल्ह्यात १४ लाख मोबाईलधारक

By admin | Published: October 28, 2015 11:50 PM

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. विविध खाजगी कंपन्यांचे मोबाईल ग्राहक हे १२ लाख ७७ हजारांवर आहेत. तर सर्वात कमी भारत दूरसंचार निगमला ग्राहकांनी पसंती दिली आहे. मोबाईल स्पर्धेत बीएसएनएल मागे पडल्याचे दिसून येते. बीएसएनएलच्या सेवेला १ लाख २३ हजार लोकांनी पसंती दिली आहे.विशेष म्हणजे यात १९ हजार ५९६ लँडलाईन फोन वापरणाऱ्यांची संख्या आहे. अलिकडे प्रत्येकांच्या हाती मोबाईल आल्यामुळे लँडलाईन कालबाह्य होणार का? अशी भीती वाटत होती. मात्र अलिकडे हा आकडा वाढू लागला आहे. आजही लँडलाईन वापरणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण असल्याचे मानले जाते. आपल्या व्हीजेटिंग कार्डवर मोबाईल क्रमांकाबरोबर लँडलाईनचा क्रमांक असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. गेल्या दहा वर्षापूर्वी हाच आकडा ८० हजारांच्या घरात होता. आता ७५ टक्के ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. बीएसएनएलने अलिकडे नव्या-नव्या योजना सुरु केल्या आहेत. मोबाईलच्या बाजारात खाजगी कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही महिन्याकाठी जिल्हाभरात शेकडो कोटींच्या घरात आहे. खाजगी कंपन्यांची सेवा सुरु आहे. प्रत्येकांत मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत बीएसएनएलची मात्र सरकारी स्पर्धा आहे. या खाजगी कंपन्यांच्या मानाने बीएसएनएलकडे एवढी अत्याधुनिक यंत्रणा नाही. आहे त्या यंत्रणेवर बीएसएनएल आपला गाडा हाकत आहे. रोज नव्या-नव्या योजनांचा धमका सुरु करुन ग्राहकांच्या खिशातून कसा पैसा काढता येईल, यासाठी खाजगी कंपन्या विचार करतात. सध्याला खाजगी कंपन्यांत मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपल्याच कंपनीकडून ग्राहकांचे हित साधले जाते, असा दावा करतो. ग्राहकांना विविध आॅफर देवून, आकर्षित केले जाते. या आकर्षणापोटी मोबाईल ग्राहक महिनाकाठी किमान सातशे ते हजार रुपये आलेल्या मोबाईल बिलावर खर्च करतो.