शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
3
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
4
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
5
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
6
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
7
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
8
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
9
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
10
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
11
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
13
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
14
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
15
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
16
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
17
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
18
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
19
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
20
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक

१५ थकबाकीदारांची मालमत्ता होणार जप्त

By admin | Published: November 11, 2014 11:58 PM

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार न्यायालयात जिल्ह्यातील १५ थकबाकीदार संस्थेच्या संचालक व सभासंदाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते.

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार न्यायालयात जिल्ह्यातील १५ थकबाकीदार संस्थेच्या संचालक व सभासंदाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. सहकार न्यायालयाने त्यांच्या विरुद्धचे डिक्री सर्टिफिकेट दिले असल्याने आता सदरील १५ थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीचे अधिकार प्राप्त झाले आहेत. कर्ज भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. कर्ज न भरल्यास आता थेट जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीस मंडळाचे अध्यक्ष डी.बी. मुकणे यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध संस्थांनी कोट्यावधीचे कर्ज घेतले होते. एकूण ४४५ संस्थांनी १७८ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ३५४ संस्थांकडे १२३ कोटी ५९ लाख रूपये कर्ज आहे. यातील ४० संस्थांना बँकेच्या वतीने वारंवार नोटीसा पाठविण्यात आल्या मात्र त्यांनी कर्ज न भरल्याने औरंगाबादच्या सहकार न्यायालयात दावे दाखल केले होते. या ४० संस्थांकडे ७६ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे़ थकीत बाकी तात्काळ भरावी या आशाच्या या नोटिसा होत्या मात्र त्यांनी कर्जाचा भरणा केला नसल्याने त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मयत कर्जदारांच्या कुटुंबीय, वारसदाराकडून वसूलीडीसीसी बँकेमार्फत ज्यांनी-ज्यांनी कर्ज घेतले आहेत त्यांना नोटीसा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास सर्वांना नोटिसा मिळाल्या आहेत. संस्थेचे संचालक मयत झाले असतील तर त्यांचे वारसदार,कुटुंबियाकडून कर्जाची वसूली होणार आहे. डीसीसीमार्फत अनेक संस्थांनी कर्ज घेतले आहे. जुन्या सर्व थकबाकीदारांची माहिती काढली जात आहे व नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने थकबाकीदारांना नियम १०७ अंतर्गत डिमांड नोटीस पाठविण्यात आली आहे़ सर्व थकबाकीदारांनी कर्ज भरावे, असे आवाहन प्रशासक मुकणे यांनी केले आहे़सहकार न्यायालयात खटले दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या वतीने चार्टड अकाँऊटंट मार्फत खाते उताऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेशित केले जाते. ही पध्दत वेळखाऊ आहे़ दावे लवकरात लवकर निकाली काढले जावेत यासाठी दावा न्यायालयात दाखल होण्यापूर्वी बीड येथूनच चार्टर्ड अकाँऊटंट मार्फत खाते उताऱ्यांची पडताळणी करण्यात आली असल्याचे प्रशासक डी.बी. मुकणे यांनी सांगितले. त्यामुळे खटला दाखल झाल्यानंतर फारशा अडचणी भासणार नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.