शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

१५७ ठिकाणचे पाणी दूषित

By admin | Published: March 20, 2016 11:43 PM

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़मुखेड तालुक्यात मागील दोन वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला पुढे जावे लागत असून जमिनीची पातळी खालावली आहे़ ग्रामीण भागात पुरवठा केले जाणारे अशुद्ध असल्याचे अनेकवेळा पुढे आले असतानाही ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे़ ग्रामीण भागात शौचालय व सार्वजनिक नाल्याची व्यवस्था नसल्याने घाण पाणी जमिनीत मुरते़ ग्रामीण भागातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसतात़ ती घाण पावसाळ्यात वाहून विहीर, तलाव, नदीत जाते आणि तोच पाणी शुद्ध न करता पुरवठा केला जातो़ गावातील सार्वजनिक विंधन विहीर, हातपंप व बोअरजवळच ग्रामस्थ धुणे धुतात़ जनावरांना पाणी पाजवून त्याच ठिकाणी पशूधन धुतले जाते़ तेच घाण पाणी जमिनीतून मुरून पुन्हा हातपंपाच्या द्वारे पिण्यास वापरण्यास घेतला जातो़ अशा पाण्याची अनुजैविक व रासायनिक तपासणी केली असता सदर पाणी दूषित असल्याचे सांगितले जाते; पण ग्रामस्थांना दुसरे शुद्ध पाणी मिळत नसल्याने मजबुरीने पाणी प्यावे लागते़ अशुद्ध पाणी सेवनाने अनेक रोग पछाडतात़केंद्र शासनाने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी मागासक्षेत्र अनुदान योजनेत नांदेड जिल्ह्याची निवड केली होती़ या योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यातील ५८ गावांत जलशुद्धीकरण उपकरणे बसवण्यासाठी ८ जानेवारी १५ रोजी पंचायत समितीने परवानगी मागितली होती़ यापैकी ३३ गावांसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी देत यासाठी लागणारा १ कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता़ पण संबंधित ग्रामसेवकाने जलशुद्धीकरण सयंत्र बसवण्याच्या कामात हाती घेतली नाही़ यामुळे या योजनेचा निधी परत गेला़ ग्रामसेवक संबंधित अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ३३ गावांतील ग्रामस्थांना आजही अशुद्ध पाणी सेवन करावे लागत आहे़ यापूर्वी ८० गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले होते़ तीन महिन्यात आणखी ४६ गावांतील पाणी स्त्रोत आले आहे़स्थानिक प्रशासन व ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभारामुळे बंद पडलेली शुद्ध पेयजल योजना पुन्हा कार्यान्वित करून तालुक्यातील प्रत्येक गावात ही योजना राबवण्यणाची सुरुवात करावी यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जांबचे सरपंच बाळासाहेब पुंडे, तारदडवाडीचे सरपंच हणमंत नरोटे, सावरगाव वाडीचे सरपंच नारायण चमकुरे, खैरक्याचे सरपंच लक्ष्मण पाटील खैरकेकर, जुन्याचे सरपंच मारोती पाटील अमनर यांनी केले आहे़