शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:26 AM

जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याची औपचारिक घोषणा निकालाच्या वेळी होणार असून, नगर परिषद गटासाठी ४ आणि नगर पंचायतीच्या एका जागेसाठी मतदान होण्याची चिन्हे आहेत.दर पाच वर्षांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक घेतली जाते. जिल्हा परिषद गटातून १९ आणि नगर परिषद ४ व नगर पंचायत गटातून एक सदस्यांची निवड होते. यंदा जिल्हा परिषद गटातून १९ जागांसाठी १९ अर्ज आले आहेत. त्यामुळे या जागांसाठी मतदान होणार नाही, हे स्पष्ट आहे. तर सामंजस्यातून सर्वपक्षीय नेत्यांमध्ये जागा वाटप झाल्याचे सूत्रांनी सांगितले.यामध्ये शिवेसना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस १ आणि भाजपच्या ८ सदस्यांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे निधी फारसा मिळत नव्हता. पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. राजेश टोपे यांनी जिल्ह्याला नियोजन समितीसाठी राज्य शासनाकडून वाढीव निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रलंबित विविध विकास प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे नियोजित विकास कामे करण्यासही निधीची अडचण येणार नसल्याचे दिसून येते.२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी जवळपास २५१ कोटींंचा निधी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्याला मिळणार असल्याने मातब्बरांनी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद गटातून १९ सदस्यांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर नगर परिषद गटातून २८ आणि नगर पंचायत गटातून ६ अर्ज आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १८ आॅगस्ट ही मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी २२ रोजी मतदान आणि २३ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.