शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
2
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
3
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
4
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
5
Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या
6
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
8
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
9
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
10
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
11
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
12
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
13
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
14
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
15
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
16
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
17
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
18
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
19
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
20
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांकडून जुनी जलवाहिनी बदलण्यास १९० कोटी मंजूर, वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 8:10 PM

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जुनी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. १९० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी बदलण्यात येईल. या प्रस्तावाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

१,६८० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे. तूर्त औरंगाबाद शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यात तर पाणीप्रश्न अधिक गंभीर बनतो. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत १९७५ साली टाकण्यात आलेली जुनी जलवाहिनी बदलण्याचा पर्याय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचविण्यात आला होता. त्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अंदाजपत्रक तयार करून शासनाला सादर केले होते. जवळपास १९० कोटी रुपये जलवाहिनी बदलण्यास खर्च येणार आहे. सध्या या जलवाहिनीतून ३० ते ३५ एमएलडी एवढेच पाणी येत आहे. जलवाहिनी बदलल्यानंतर शहराला किमान ६५ ते ७० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज तज्ज्ञांना आहे. या जलवाहिनीमुळे शहरात वाढीव पाणीही येईल.

‘लोकमत’चा पाठपुरावाशहराची तहान भागविण्यासाठी ७०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त जिल्ह्यातील रखडलेल्या प्रस्तावांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनी बदलण्यासाठी १९० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली.

काम मनपा करणार?महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अगोदरच १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सोपविण्यात आले आहे. त्यात आता आणखी जलवाहिनीचे काम दिल्यास मुख्य योजनेच्या कामाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम मनपाकडे सोपविण्यात येऊ शकते, असे सुतोवाच दोन दिवसांपूर्वीच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका