शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

नियमांकडे दुर्लक्ष भोवले; २० कृषी सेवा केंद्रांना ‘स्टॉप सेल’च्या नाेटीस

By बापू सोळुंके | Published: June 10, 2023 7:24 PM

एकाही शेतकऱ्याचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्रचालकांसाठी कृषी विभागाने नियम घालून दिले आहेत.

औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदीची लगबग सुरू केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते विक्री केल्याचे अद्ययावत रेकॉर्ड ठेवण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० कृषी सेवा केंद्रांना तीन आठवडे माल विक्री थांबविण्याच्या (स्टॉप सेल)च्या नोटीस कृषी विभागाने बजावल्या.

बियाणे, खते आणि कीटकनाशकाची शेतकऱ्यांना नियमानुसार विक्री करावी. एकाही शेतकऱ्याचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्रचालकांसाठी कृषी विभागाने नियम घालून दिले आहेत. या नियमानुसार खते आणि बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांना पावती देणे, दुकानात उपलब्ध असलेल्या खतांची माहिती देणारा बोर्ड दर्शनी ठिकाणी लावावा, कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना जादा दराने माल विक्री करू नये, विक्री केलेल्या बियाणे आणि खताची नोंद रजिस्टरमध्ये करणे, ई-पॉसमध्ये खत विक्रीची नोंद करणे दुकानदाराला बंधनकारक आहे.

कृषी सेवा केंद्रचालक नियमांचे पालन करतात अथवा नाही, तसेच शेतकऱ्यांना बियाणे आणि खत विक्री करताना अडवणूक करतात का? याबाबतची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना केली आहे. या सोबतच तालुका कृषी अधिकारी, पंचायत तालुका कृषी अधिकारी यांनाही अचानक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत २० कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे आणि खत विक्रीचे रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आढळले. त्यामुळे या कृषी सेवा केंद्र चालकांना जिल्हा कृषी अधीक्षकांच्या निर्देशाने नोटीस बजावण्यात आल्या. तीन आठवडे हे दुकानदार त्यांच्याकडील मालाची विक्री करू शकणार नाहीत. ऐन हंगामात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईने कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.

दोन दुकानांचे परवाने होणार निलंबितजिल्ह्यातील दोन दुकानदारांना ऑफलाइन खत विक्री करणे महागात पडले आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार कृषी सेवा केंद्र चालकांना खत विक्री करण्यासाठी ई-पॉस मशिन देण्यात आले आहे. या मशिनमध्ये नोंद केल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या आधारकार्डची नोंद करूनच त्यांना खत विक्री करणे गरजेचे आहे. मात्र, दोन दुकानदारांनी ऑफलाइन खत विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाने सुरू केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद