शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

२० छावण्यांना मंजुरी

By admin | Published: August 26, 2015 11:47 PM

बीड : छावणी उभारण्याचा शासन निर्णय होऊन आठवडाभराचा कालावधी लोटत आला आहे तरी देखील बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष छावण्या उभारून

बीड : छावणी उभारण्याचा शासन निर्णय होऊन आठवडाभराचा कालावधी लोटत आला आहे तरी देखील बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष छावण्या उभारून मुक्या जितराबांना चारा मिळालेला नाही. छावण्या वाटपात होत असलेल्या राजकारणामुळे जनावरांची तरफड सुरू आहे. आता तर छावण्या मंजुरीसाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या शिफारशींचा पाऊस सुरू असल्याचे चित्र महसूल प्रशासनात पहावयास मिळत आहे. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत २० छावण्यांना मंजुरी मिळाली आहे.जिल्ह्यात साडेनऊ लाखाच्या जवळपास लहान-मोठी जनावरे आहेत. चाऱ्याअभावी पशुमालक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ छावण्या सुरू करणे अपेक्षित होते. होत असलेल्या छावणी उभारणीच्या विलंबामुळे चाऱ्याअभावी जनावरांची तडफड सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिरूर कासार तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क जनावरांचा चारा संपला म्हणून फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. एवढी भयाण परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पुढाऱ्यांकडून छावणीत राजकारण होत आहे. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर छावणी मंजुरीसाठी दबाव आणला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.गाव एक शिफारस पत्र अनेककार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी मागेल त्या कार्यकर्त्याला नेत्याकडून शिफारस पत्र मिळत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. एका गावात एका ठिकाणी एक छावणी उभारण्यासाठी नेत्यांनी आपल्या दोन ते तीन कार्यकर्त्यांना पत्र दिलेले असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले होते. यामध्ये बीड जिल्ह्यातील एका विद्यमान आमदाराने चक्क एका ठिकाणच्या छावणीमंजुरीसाठी दोन ते तीन जणांना पत्र दिले असल्याचे एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिफारस पत्रांचा हा पाऊस सुरू असल्याने कार्यकर्त्यांसमोर नेते उघडे पडत आहेत.कार्यकर्त्यांनाही आपल्या नेत्याचे आश्चर्य वाटत आहे. एका गावातून दोन ते तीन कार्यकर्त्यांना छावण्या सुरू करण्याचे शिफारसपत्र दिले असल्याने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चेला उधाण आले होते. (प्रतिनिधी)गुरूवारी छावणीचे मंजूरीपत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्ष चारा छावणी सुरू होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे चारा मिळण्यास अजून विलंब लागत असल्याने पशुमालक चिंतेत आहे.बुधवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतलेल्या बैठकीत २० छावण्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आष्टी ४, बीड ३, पाटोदा २, शिरूर कासार १ यासह इतर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा छावण्यांना मंजुरी दिली आहे. दरम्यान इतर तालुक्यांमधून देखील छावणी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत.ज्या संस्था छावणी चालविण्यास सक्षम आहेत त्यांनाच चारा छावणीची मंजूरी देण्यात येईल. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन छावणीचालकांनीही कामामध्ये तत्परता दाखवावी. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे छावणी चालकांनी तंतोतंत पालन करणे आवश्य आहे. जे कोणी छावणी चालविताना नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. छावण्या तात्काळ सुरू करण्यात येतील.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी