शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

बारावी परीक्षेचे जिल्ह्यात २६ केंद्र

By admin | Published: February 16, 2016 11:34 PM

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १८ फेबु्रवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १८ फेबु्रवारी ते २८ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील एकूण २६ केंद्रांतून १० हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. २०३ पुनर्परीक्षार्थिंचा समावेश आहे. कॉपीमुक्ती अभियान राबविण्यासाठी शिक्षण विभागाने बैठे व ४ फिरती पथके तैनात केली आहेत.बारावीच्या परीक्षेस १८ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक झाली. कासार यांनी परीक्षा सुरळीत पार पडावी, तसेच परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, याबाबत शिक्षण विभागास सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जि.प. कन्या शाळेत १६ फेबु्रवारी रोजी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील शिक्षणाधिकारी व गंगाधर जाधव यांच्या उपस्थितीत सकाळी बैठक घेण्यात झाली. संबंधित गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.जिल्ह्यात २६ केंद स्थापन केले. यामध्ये हिंगोलीत ७ केंद्रावरून २०८७ विद्यार्थी, वसमत येथील ८ केंद्रावरून ४११३, औंढा येथील ४ केंद्रावरून १०००, कळमनुरी येथील ३ केंद्रावरून १७७३ तर सेनगाव येथील ४ परीक्षा केद्रांवरून १५९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळच्या सत्रात ११ ते २ तर दुपारच्या सत्रात व ३ ते ६ यावेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे.