शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२७९ गावांमध्ये अशुद्ध पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:39 IST

बीड जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरच नसल्याने ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरच नसल्याने ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. शासनाकडून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा निधी उपबलब्ध होत असतानाही ग्रामीण पातळीवर उदासिनतेमुळे विविध आजारांचा सामना जनतेला करावा लागत आहे.जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत आढावा घेतल्यानंतर हे धक्कादायक वास्तव पुढे आले. गावपातळीवरील निवडणूक जिंकण्यासाठी विविध फंडे राबविणारे लोकप्रतिनिधी गावकारभारी झाल्यानंतर मात्र स्थानिक राजकारणात व्यस्त असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता, पाणी, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने समस्यांमध्ये भर पडत राहिली आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या बैठकीत, समन्वय समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वेळोवेळी आली. तसेच ही बाब ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्र्यांच्याही निदर्शनास आलेली आहे. त्यानुसार गटविकास अधिकाºयांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या तरीही अद्याप उपाययोजना कोठेही झालेली नाही.ब्लिचिंग पावडर उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड दिसली नाही. या दुर्लक्षतेमुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. परिणामी विविध आजार बळावल्याने खाजगी व सरकारी रुग्णालयांचा ग्रामस्थांना आधार घ्यावा लागत आहे. गोदाकाठच्या गावांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यात नियमितपणे पाणी नमुने तपासले जात आहेत. पावसाळ्यात पाणी शुद्धीकरण आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर उपलब्ध करुन वापर आणि शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आजार टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत उपाययोजना केल्या पाहिजेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.