शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

'समाजासाठी बलिदान समर्पित', मराठा आरक्षणसाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:50 IST

विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविली.

फुलंब्री : तालुक्यातील पाल गावातील 28 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. रवींद्र बाबुराव जाधव(वय 28 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

रवींद्र जाधव याने सोमवारी दुपारी 3 वाजेच्यादरम्यान पाल ते आडगाव दरम्यान शेतातील घरात विषारी औषध घेतले अन् तिथेच कोसळला. कुटुंबातील लोक सायंकाळी शेतात आले असता तो पडलेला आढळून आला. त्याला प्रथम छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पाल येथे रात्री 9 वाजता तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र जाधव हा पाथ्री येथील महावितरण कार्यालयात ऑपेटर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलीरवींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये 'जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा...मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील लढा देत आहेत, परंतु आरक्षण मिळत नाही. मी आज माझे जीवन संपवित आहे. समाजाला माझे जीवन समर्पित करीत आहे,' असे चिठ्ठीत लिहून ठेवल्याचा दावा त्याच्या निकटवर्तीयांनी केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश काळे करीत आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर