शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

३ टक्केच पाणी

By admin | Published: December 09, 2015 11:30 PM

व्यंकटेश वैष्णव , बीड सरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडसरासरी पेक्षा निम्माच पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पत पाणीच साचले नाही. अजून सहा ते सात महिने टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत जिल्हयात केवळ ३.०५ टक्केच पाणी शिल्लक आहे. बीड जिल्हयात एकूण मोठे, मध्यम व लघु असे १४२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ३.०५ टक्के तर २६.९९ दलघमी पाणी शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पात माजलगाव धरणात ७५ दलघमी (मृतसाठा) पाणी आहे. तर केज तालुक्यातील मांजरा धरणात केवळ २.६५३ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. हे दोन्ही मोठे धरण गतवर्षी अल्प पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.पाणीसाठ्याचा उपसा बेसुमारजिल्हयातील पाणी साठा केवळ ३ टक्यावर येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने सिंचन प्रकल्पातील अवैध पाणी उपसा थांबवला नाही तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आवघड होण्याची चिन्हे आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून सहा ते सात महिन्याचा आवधी आहे. अशी परिस्थिती उदभवलेली असताना देखील अवैध पाणी उपसा रोकण्याच्याची जबाबदारी दिलेल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र जिल्हयात आहे.५० टक्के पाणीसाठा असलेले प्रकल्पएकूण १२४ लघु प्रकल्पापैकी केवळ सहा सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध आहे. खटकळी (बीड), धामनगाव (आष्टी), भोगलवाडी (धारूर), साकूड (अंबाजोगाई), सुलेमान देवळा (आष्टी) या तालुक्यांचा समावेश आहे.सतत तीन वर्ष पावसाने दडी मारल्याने भूगर्भातील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. बोअर, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. आज घडीला बीड जिल्हयातील १४०४ गावांपैकी २३५ गावांवर टंचाईचे सावट असून शासन सदरील गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवित आहे. यासाठी एकूण १६० टँकर जिल्हयात सुरू आहेत.जिल्हयात मध्यम प्रकल्पांची संख्या १६ आहे. यापैकी केवळ तीन प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. महासांगवीत ०.७३० द.ल.घ.मी, वाणमध्ये ३.८८५ तर कुंडलिकामध्ये १२.५०० इतका पाणीसाठा शिल्लक आहे.