शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
अखेर भाजपला उमेदवार भेटला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
3
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
4
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
5
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
6
"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  
7
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
8
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
9
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
10
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
11
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...
13
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
14
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
15
देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता
16
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
17
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
18
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
20
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  

शेतकऱ्यांकडे ३ हजार कोटी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:44 AM

औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांत प्रचंड उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.यासंदर्भात औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, कृषिपंपांना सवलतीच्या व नाममात्र दरात वीजपुरवठा केला जातो. तरीही अनेक शेतकरी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.कृषिपंपांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविल्या जातात; पण अपेक्षित थकबाकी व वीज बिलांची वसुली होत नाही, तर दुसरीकडे वीज खरेदी, पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, कर्मचाºयांवर महावितरणला खर्च करावा लागतो.वीज खरेदीसाठी पूर्वीसारखी उधारीची परिस्थिती राहिलेली नाही. वेळच्या वेळी वीज खरेदीचे बिल महावितरणला चुकते करावे लागते.औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे कृषी संजीवनी ही व्याज व दंडाची ५० टक्के रक्कम माफ करणाºया योजनेला मुदतवाढ मिळते का, याकडे आमचे लक्ष आहे. सध्या केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पाणीपुरवठा, आदी ग्राहकाचीे थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले असून, वीज चोरी व गळती रोखण्यावर भर आहे.दोन जिल्ह्यांतील कृषिपंपांची सद्य:स्थितीऔरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद शहर मंडळ, औरंगाबाद ग्रामीण मंडळ आणि जालना मंडळाचा समावेश आहे. औरंगाबाद शहर मंडळामध्ये सध्या २ हजार १४२ कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू असून, त्यांच्याकडे १७ कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या ४८५ एवढी असून, त्यांच्याकडे १ कोटी ९ लाख रुपये थकबाकी आहे.औरंगाबाद ग्रामीण मंडळात वीजपुरवठा चालू असलेले २ लाख १५ हजार ४८४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १,६१९ कोटी २३ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषिपंपांची संख्या ७ हजार ८६८ एवढी असून, त्यांच्याकडे १३ कोटी ७७ लाख रुपये थकबाकी आहे.जालना मंडळात सध्या वीजपुरवठा चालू असलेले १ लाख २३ हजार १७८ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १ हजार १२४ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेले २ हजार १८७ कृषिपंप असून, त्यांच्याकडे ३ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे.दोन्ही जिल्ह्यांतील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या १० हजार ५४० एवढी असून, त्यांच्याकडे १७ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र