शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन

By प्रशांत तेलवाडकर | Published: July 03, 2024 7:55 PM

मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर

छत्रपती संभाजीनगर : सरकारने एखादी योजना आणली, तर तिचा फायदा घेणाऱ्यांपेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. बँकेतून कर्ज घेतले की, सरकार आज ना उद्या माफ करील, या गैरसमजुतीपोटी अनेक जण कर्जाची परतफेड करतच नाहीत. याचा अंतिम फटका त्या योजनेपासून वंचित राहिलेल्या व प्रामाणिक लोकांना बसतो. याचे ज्वलंत उदाहरण केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ आहे. या योजनेत ३५ हजार व्यावसायिकांना दिलेले २४९ कोटींचे कर्ज त्यांनी फेडलेलेच नाही.

६ एप्रिल २०१५ रोजी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सुरुवात झाली. कॉर्पाेरेट किंवा शेतीशी संबंधित नसलेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याला ‘मुद्रा कर्ज’ असे म्हणतात.

शिशु ते तरुण कर्जव्यवसायवाढीसाठी ज्यांना आर्थिक साहाय्य आवश्यक आहे. त्या छोट्या व्यावसायिकांना भारत सरकार मुद्रा कर्ज देते. ही कर्जे व्यवसायाच्या टप्प्यांवर आणि आवश्यक कर्जाच्या रकमेवर आधारित तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत.

शिशुकर्ज : यात नवीन व्यवसायासाठी ५० हजारांपर्यंत कर्ज मिळते.

किशोर कर्ज : यात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळते.

तरुण कर्ज : व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करण्याच्या उद्देशाने ५ लाख ते १० लाख रुपयांदरम्यान कर्ज मिळते.

बँकांकडून १८५१ कोटींचे मुद्रा लोनचे वाटप २०१५ पासून बँकांनी मुद्रा लोन देण्यास सुरुवात केली. मागील नऊ वर्षांत बँकांनी २ लाख ७८ हजार १९० व्यावसायिकांना १८५१ कोटींच्या मुद्रा लोनचे वाटप करण्यात आले.

कितीजणांनी बुडवले कर्ज? ३५ हजार व्यावसायिकांनी २४९ कोटींचे कर्ज बुडवले आहे. कर्ज एनपीए राहण्याचे प्रमाण १३ टक्के आहे.

मागील आर्थिक वर्षात १४४३ कोटींचे कर्जवाटप३१ मार्चअखेर जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ७१५ व्यावसायिकांना १४४३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर तर मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक एनपीएसुरुवातीच्या काळातील २०१५ ते २०१७ या काळात ज्या व्यावसायिकांनी मुद्रा लोन घेतले. त्यातील अनेक व्यावसायिकांनी त्याची परतफेड केली नाही. यामुळे ही खाती एनपीएमध्ये गेली आहेत. जुन्या मुद्रा कर्जाची नियमितपणे परतफेड केली की, त्यांना पुढील कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना २० लाखांपर्यंत मिळतेय कर्जमुद्रा कर्ज योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आली आहे. ज्यांनी मुद्रा लोन घेऊन त्याची नियमित परतफेड करत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदारांसाठी कर्जमर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्ज न फेडल्यास कर्जदाराच्या विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. त्यांना पुन्हा बँका कर्ज देत नाहीत; यामुळे कर्जाची नियमित परतफेड करावी.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँकbusinessव्यवसाय